नवीन लेखन...

माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१)

तेंडोलकरांच्या वाड्यांत मिळालेल्या संस्कारांनी अनेकांचे आयुष्य घडले. आजोबा वायफळ खर्च करत नसत. परंतु जेव्हां जेव्हां एखाद्याला नोकरी नव्हती, शिकायचे होते त्याला त्याला त्यांनी दार सदैव उघडे ठेवले. अडचणीत असणा-या सर्वांना वेळोवेळी आधार दिला. तिथे जेवणाखाण्याची, अंथरूण-पांघरूणाची, जागेची ददात नव्हती. शिस्त जरूर पाळावी लागे पण ती तुम्हालाच कांही शिकवून जाई. […]

माझे आजोळ – भाग २ – शिस्तप्रिय आजोबा (आठवणींची मिसळ ३०)

पणजोबा असतांना एकदा सुप्रसिध्द सरन्यायाधीश श्री छागला हे त्यांना भेटायला घरी आले. न्यायमूर्ती तेंडोलकरांचे ते मित्र आणि सहकारी. कोल्हापूरात काही कामानिमित्त आले होते. ते आवर्जून पणजोबांच्या भेटीला येणार होते. मग आजोबांनी आम्हा मुलांना कामाला लावले. कचेरी आणि बैठकीची खोली यांतली मोठी जाजमे ब्रशने साफ करून घेतली. दोन्ही खोल्यांमधे अनेक सुंदर तैलचित्रे मोठ्या मोठ्या फ्रेम्समधे लावलेली होती. त्यांच्याकडे आता दुर्लक्षच झालेली होतं. त्या उघडून चित्रं पूसून घेतली. मग ओल्या फडक्याने कांचा स्वच्छ करून घेतल्या. हे काम आम्हा तीन-चार मुलांना चार दिवस पुरलं. […]

माझे आजोळ – भाग १ – पणजोबांचे घर (आठवणींची मिसळ २९)

नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली. […]

एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले. […]

एका कुटुंबाची करूण गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २८)

तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही. […]

एका कुटुंबाची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ २७)

अण्णांच्याबरोबर पाच नंबरचा भाऊ (चंदू) अंधेरीला रहायला आला. पहिल्या पाच भावात केवळ तोच मॕट्रीक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला दोन नोकऱ्यांचे कॉल आले. एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनांव एकच होते. आद्याक्षरे मित्राची जी.एन. आणि ह्याची सी.एन. होती. त्यांचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली. […]

इस्त्रीवाला (आठवणींची मिसळ २६)

आता इस्त्रीवालेही मोठे झालेत. एखाद्या मोठ्या खोलीत, एखाद्या मोठ्या दुकानांत आतां दोन ते तीन टेबलांवर इस्त्री चालू असते. बरेच इस्त्रीवाले आता बरोबरीने लाँड्री चालवतात. लाँड्रीचा धंदा कमी झाला तरी त्याची गरज आहेच. हा धंदा हळूहळू इस्त्रीवाले ताब्यात घेतायत. वूलन कपडे, सिल्कचे कपडे इ. चे ड्राय क्लिनींग असते. डिझायनर ड्रेससारखे कपडेही साफ करायला येतात. मुंबईत तरी इस्त्रीवाल्यांनी बहुसंख्यांचे कपड्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. […]

मजुरांचा बाजार (आठवणींची मिसळ २५)

मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात. […]

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही. […]

जीवननाट्य नाटीका क्र. ३ (आठवणींची मिसळ २३)

आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार. […]

1 2 3 4 5 6 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..