नवीन लेखन...

नववधू

नववधू नवासाज लालेलाल रंगी आज खुले रंग मेहंदीचा प्रेमभाव हा प्रीतीचा हाती चुडा भरला गं येई आता साजण गं सलज्जता वाढलीच हाती हात गुंफलीच गौरवर्णी हातावरी मेहंदिची नक्षी खरी जाई आता सासरला गुंती मन माहेराला मनातुनी बावरली सख्या भेटी आतुरली मालत्यांनी ओटी भरा लेक जाई तिच्या घरा सौ.माणिक शुरजोशी नाशिक

अनुभूतीच्या पलीकडे ? (नशायात्रा – भाग ५)

अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना अश्या प्रकारचा मात्र थोडा वेगळा अनुभव आलेला आहे असे नमूद केलेले आढळले, मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता, एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता व व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते. […]

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो,  त्यांना माहीत नव्हते सहजपणे सुचणारे,   संभाषण ते असते….१, शिक्षण नव्हते कांहीं,  अभ्यासाचा तो अभाव परि मौलिक शब्दांनी,  दुजावरी पडे प्रभाव…२, जे कांहीं वदती थोडे,  अनुभवी सारे वाटे या आत्म्याच्या बोलामध्ये,  ईश्वरी सत्य उमटे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

कुठे कशी भेटू तुला

कुठे कशी भेटू तुला, घर भरले पाहुण्यांनी, चोरटी ती पहिली भेट, गेली मला थरथरवुनी ,!! होता आपुली नजरानजर, माझी न राहिले मी, दुसरे काही नसे डोळ्यात, जीव कातर कातर होई,–!!! घर अपुरे पडे आता, जरी असे ते दुमजली, स्वतःचाच नसे पत्ता, तुलाच शोधे ठिकठिकाणी–!!! साजिरी मूर्त बघता, अंत:करण फुलून येई, आत होते चलबिचल, छळते जिवाला अस्वस्थता,–!!! […]

हरिप्रिया

संवाद लेखन हरिप्रिया १) प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट. १) प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार? २) प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो. २) प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे ३) प्रियकर:-अन् तो दिवस उगवला . ३) प्रेयसी:-१५ऑगस्टचा ४) प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!! ४) प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस. ५) प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला. […]

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ५

मुक्ती हवी माये पासून. माया ही वेडीवाकडी आहे. त्या वक्रा असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतात त्यांना वक्रतुंड असे म्हणतात. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात की अशा वक्रतुंडांचे मी नित्य आदराने नमन करतो. […]

तुझ्या शिवाय जगणं नाही रे…..

तुझ्या शिवाय जगणं नाही रे,श्वास घेणं ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वप्न पाहणं ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,कोणत्याही गोष्टीत मन रमवने ही अवघड आहे रे…. तुझ्या शिवाय जगणं नाही रे,स्वतःला सांभाळणं खूप अवघड झाले रे…. स्वतःला शोधत आहे पण ठाऊक नाही कोणत्या दुनियेत हरवलि आहे रे…. तुझ्या विना जग […]

हृदय अर्पिले तुला

हृदय अर्पिले तुला,गजानना वाट दाखव मला, *वेदना यातनांचा, उठतो कल्लोळ, शरीर आणि आत्मा, नच कुठे मेळ*, काया वाचा मने, स्मरते रे तुला, गजानना वाट दाखव मला,–!||१|| विघ्नहर्ता असशी तू , जागृत किती देवता, हाक तुज मारता, मदतीस धावतोस भक्ता, हृदयापासून करत अर्चना, विनविते मी तुला, गजानना वाट दाखव मला,–!||२|| रक्तवर्णी त्या सर्व पुष्पी, अर्पिते मी तुझ्या […]

साहित्यिक

साहित्यिक परखड लिहीतात अंजनही घालतात व्रत घेती लिखाणाचे जागरण समाजाचे अग्रलेख मुद्देसुद देखरेख साळसुद माहितीचा स्त्रोत वाहे अखंडची टिका साहे विविधांगी लेख लिही साहित्यात नसे दुही साहित्यिक अग्रस्थानी वैचारिक खतपाणी ज्ञानदाते बुद्धित्राते नमू तया चरणाते सौ.माणिक शुरजोशी नाशिक

1 138 139 140 141 142 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..