नवीन लेखन...

‘आई’चा संप..

आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी ते जबरदस्तीन अडवून रस्त्यावर फेकून दिलं अश्या बातम्या पेपरात आहेत. विकायला निघालेले खरे शेतकरी व त्यांचा माल जबरदस्तीने अडवून रस्त्यावर फेकणारे खोटे शेतकरी अशी विभागणी मी करतो. स्वत:चा माल गुदामात सुरक्षित ठेवून दुसऱ्या शेतकऱ्यांचा माल, भाजीपाला, दुध युनियनच्या जोरावर काढून घेऊन रस्त्यावर नासाढी करायचा, ही काहीशी काश्मिर खोऱ्यातल्या अलगांववाद्यांसारखी मानसिकता आहे. स्वत:च्या पोरांना परदेशात उच्च शिक्षणाला पाठवायचं आणि लोकांच्या मुलांना शाळा सोडून लष्करावर दगड मारण्यासाठी उचकवायचं असा प्रकार हा आहे असं माझं मत आहे. कष्टाने कमावलेलं, पिकवलेलं, ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ माणणारा हाडाचा शेतकरी, असं रस्त्यावर कधीही फेकून देणार नाही, कारण तो परिस्थितीने गरीब असला तरी संस्कृतीने श्रीमंत आहे. ‘आई’ असं शिदवलेलं उकिरड्यावर फेकून संपावर जात नाही हे जे म्हणतो, तो एवढ्यासाठीच…

पूर्ण वाचण्यासाठी खाली नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करा..!
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1356283091093211

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..