नवीन लेखन...

विक्रम – वेधा

मी एक तमिळ मुव्ही पाहिली .
अर्थात हिंदी भाषेत डब केलेली .
विक्रम-वेधा हे नाव त्या मुव्हीचे .

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या या प्रादेशिक भाषेतील मुव्हीने ६० करोडचा व्यवसाय केला म्हणतात .

आर . माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय , अंडरवर्ल्ड चे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण , पोलिसदलातील अंतर्गत राजकारण , अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी .

कुणीतरी म्हणेल मग की हे सारे हिंदी , इंग्रजी मुव्हीत असते . मग यात वेगळेपण काय ?

तर यात तथाकथित लव्हस्टोरी नाही , नग्नतेचे अतिरेक करणारे आणि उबग आणणारे चित्रण नाही , ओढून ताणून आणलेला विनोद नाही , बटबटीतपणा नाही , राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाचे चित्रण नाही , प्रचंड क्रौर्य नाही , अविश्वसनीय ,अकल्पित चित्रण नाही , पार्श्वसंगीताचा बेसुमार ,अवाजवी भडिमार नाही , बलात्कार नाही , अत्याचार नाही , मानवी भावनांचे बटबटीत प्रदर्शन नाही , मेकअप चा अतिरेक नाही . आणि अर्थहीन गाणीसुद्धा नाहीत .

तरीही हा चित्रपट भावतो .

मग हा चित्रपट का म्हणून पहावा ?
असा कुणालाही प्रश्न पडेल .
त्यासाठी जरा ष्टोरी सांगायला हवी .

तुम्हाला चांदोबातील विक्रम वेताळाच्या कथा आठवतात ?
विक्रमादित्याच्या मानेवर बसलेल्या वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणि त्यासाठी कथा सांगताना आपण विक्रमादित्य राजाला वाचलेले आहे .

अगदी बरोबर !
इथेही चित्रपटाची सुरुवात विक्रमादित्य आणि वेताळाच्या कथेने होते आणि आपण नकळत त्या पौराणिक कथेतून वर्तमानातल्या एन्काऊंटर करण्यात माहीर असणाऱ्या आर माधवन (विक्रम) आणि अंडरवर्ल्ड मधील विजय सेथुपथी ( वेधा ) यांच्या कथेत केव्हा शिरतो ते कळत नाही .
दोघांची भिन्न व्यक्तिमत्वे , हुशारी , एकमेकांवर करण्यात येणाऱ्या कुरघोडी , वेधा चा गोष्टी सांगण्याचा स्वभाव आणि त्या गोष्टीतून विक्रमला मिळणारी खबर अशा अनेक गोष्टीत आपण रमतो .
त्या दोघांच्या आयुष्यातील चढउतार , त्यांचे नातलग , त्याविषयीच्या भावना , पुढे काय होणार याची लागणारी प्रचंड उत्कंठा , विक्रम वेताळ कथेचे येणारे संदर्भ , प्रत्येक प्रसंगातून कळणारे सहजसुगम तत्वज्ञान , प्रत्येक फ्रेमचे आर्टवर्क , पोलिसदलातील भ्रष्टाचार अशा अनेक गोष्टीवर हा चित्रपट भाष्य करीत जातो .
वेधा चा एन्काऊंटर करायचा असूनही दरवेळी विक्रमला ते का जमत नाही याचेही गूढ वाटत राहते आणि ते चित्रपटाच्या शेवटी उलगडते .

चित्रपटाचा शेवट मी सांगणार नाही , कारण दिग्दर्शकाने शेवट काय असावा हे आपल्यावर सोडले आहे . पण इतकेच सांगेन की विक्रमादित्य आणि वेताळ यांची कथा आठवा .

मला हा चित्रपट बेहद्द आवडला .
तो बघा आणि मग मला सांगा की त्यात काय , किती आणि कसे वेगळेपण भरले आहे .
तो युट्युबवर उपलब्ध आहे .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..