नवीन लेखन...

श्रीहरि स्तुति – २०

कोशानेतान्पञ्च रसादीनतिहाय
ब्रह्मास्मीति स्वात्मनि निश्चित्य दृशिस्थम्।
पित्रा शिष्टो वेद भृगुर्यं यजुरन्ते
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२०।।

त्या परब्रह्मात विधी न होणे हीच भारतीय संस्कृतीची अंतिम अवस्था आहे. अर्थात एखाद्या गोष्टी पर्यंत जायचे असेल तर कसे आलो? हे समजून घ्यावे लागते. मग त्याच्या विपरीत प्रवास करीत मूळ पदापर्यंत जाता येते.

याला अपवाद न्याय असे म्हणतात. जगताच्या भासमान स्वरूपाला अभ्यासासाठी मान्य केल्यानंतर या जगाची निर्मिती कशी झाली याचे वर्णन शास्त्रात केले आहे.
आपण जीवनदशेला येण्यासाठी पाच कोशांचा आधार घेऊन प्रगत होतो असे शास्त्राने वर्णन केले.
अन्नमय ,प्राणमय ,मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांचे शास्त्रात वर्णन आहे.
यातील अन्नमय कोशाला स्थूल देह, प्राणमय ,मनोमय आणि विज्ञानमय कोशांना सूक्ष्म देह तर आनंदमय कोशाला कारणदेह असे म्हणतात.
या सर्व उपाधींचा त्याग केल्यानंतर असलेल्या शुद्ध परमात्म्यात विलीन होता येते.
ते सांगताना आचार्य म्हणतात,

कोशानेतान्पञ्च रसादीनतिहाय – या पाच कोशांमधील रस म्हणजे आसक्ती सोडून,
ब्रह्मास्मीति स्वात्मनि निश्चित्य दृशिस्थम् – मी ब्रह्म आहे हे आत्म स्वरूपाच्या ठिकाणी निश्चित करून,
पित्रा शिष्टो वेद भृगुर्यं यजुरन्ते –
भगवान वरुण यांनी उपदेश केल्यानंतर महर्षी भृगु ना चिंतनाच्या शेवटी जे परमतत्व समजले,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..