डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर […]
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्रीखंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून त्यांला आद्य क्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली. […]
उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणुस एकुणच मागे आहे हे आता सगळेजण जाणतातच आहेत. पण आता या क्षेत्रांत मराठी महिला धडाडिने पुढे येत आहेत असे सुखद चित्र निर्माण होऊ लागले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत आज मराठी नव्हे तर इतर महिला मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहेत. अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या प्रमुखपदी महिला आहेत आणि त्या सक्षमतेने कारभार चालवीत […]
‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक […]
कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. […]
विद्वत्ता माणसाला प्रतिभेसारखीच उपजत मिळत असते, तो एक सहज गुण आहे. विद्वत्तेला अध्ययनाने आणि अभ्यासाने विकसित करता येते आणि विद्वान व्यक्ती ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अध्ययनरतच रहात असते. त्या व्यक्तीच्या अवती भोवती विद्वत्तेचे प्रखर तेज प्रकाशत असते, पण तो विद्वत्सूर्य मात्र चंद्रासारखा शीतल आणि पिकलेल्या फळांनी फलभारित झालेल्या झाडाप्रमाणे अवनत रहातो. […]
१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं. त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- “अभी मैं जो हिंदी कविता सुनाने […]
सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली. […]
भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी.. एअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध […]
असा देशभक्त वैज्ञानिक एकत्र आणि गरिब कुटुंबात जन्माला आला, लहानपणी कष्टाला, पण शिक्षणचा ध्यास नाही सोडला, त्यासाठी पेपरही विकला, डिग्र्या आणि सन्मानांचा गर्व नाही झाला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने वडिलांच्या संस्कारांचा आणि थोरामोठ्यांच्या सल्याचा आदर केला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने आयुष्यभर फक्त देशासाचे हीत बघितले देशासाठी काम केले ! देशाला आंतरीक्ष आणि अणू विज्ञान-तंत्रज्ञानात […]