भगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो. […]
भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो. […]
परिक्रमेची मुळ भावना वैराग्य, संसारापासुन अलिप्त होणे, इश्वर प्राप्तीसाठीचा शोध, प्रयत्न, असावा किंबहुना असायला हवा. मी कोण? माझे काय?आत्मा काय? मोक्ष काय? माझे जगात येण्याचे प्रयोजन काय?ह्या व असल्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच, ब्रम्हांडाचा शोध, स्वत:तला मी नष्ट करणे इत्यादी महान कार्यांसाठीच संत-महात्मे परिक्रमेसाठी आलेत…. […]
प्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात….. […]
भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात, […]
नर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले नाही पण तिला मान्यतेप्रमाणे,एक कुमारिका समज़ुन तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे .मी पण जे अनुभवले ते पण हुबेहुब तसेच, त्यामुळे वेगळे असे शब्दांकन काय करणार ? […]
कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते. […]