अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे : […]
श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे. […]
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]
भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे. […]
सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो. […]
अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. […]
वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….. […]
तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात… […]