“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून. […]
भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती. […]
५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते. […]
डॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले. […]
समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती. […]
काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे ! “अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं. […]
राजकपूर यांनी बरसात या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. चित्रपट सर्वच दृष्टीने गाजला. राजकपूर यांचा बरसात चित्रपट म्हणजे ही जणू एक भावस्पर्शी कविताच होती. या चित्रपटामुळे राजकपूर यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. २१ एप्रिल १९४९ रोजी बरसात चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकपूरचे गुरू केदार शर्मा यांच्या मते ‘बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून बरसातचा उल्लेख करावा लागेल. […]
कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.” अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी – साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला. […]
पण “दस्तक” मधील लता -सुरीली ! आपल्या आवडत्या मदन भैय्या च्या ओंजळीत ती सगळा गोडवा ओतायची, आणि ही गोड तक्रार खय्याम पासून सर्वांची ! लताच्या सर्वाधिक आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात मदनमोहनची जास्त आहेत. पारितोषिकांनी या चित्रपटाची झोळी भरली. यथावकाश या चित्रपटातील सर्व मंडळी कर्तृत्वाच्या उंचीवर पोहोचली – अपवाद रेहानाचा ! तिची दस्तक कानांवर जास्त काळ रेंगाळली नाही. […]
अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो -हिरॉईनची, सोबतीला गुप्ते ,पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी ! आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही. […]