नवीन लेखन...

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला.

दोघांनाही न्याय द्यावा लागला, मात्र यात झोपमोड झाली. रात्री १ वाजता गुलज़ार कार्यक्रमाचा आस्वाद चघळत -चघळत घरी परतलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता नाटक ! इतकं बॅक टू बॅक हल्ली दमवतं !

माणूस निर्माण झाला आणि त्याच्या भोवती नाती निर्माण झाली. कारणं काही असोत ,नाती दिवसेंदिवस स्ट्रेस निर्माण करू लागली आहेत. त्यात नवा कन्सेप्ट – स्पेस (अवकाश) चा ! प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटते. पण त्या अवकाशाचे आकारमान किती असावे याबद्दल फक्त गोंधळ ! नाती आजकाल या स्पेसवर अधिकार गाजवायला लागतात आणि यथावकाश “अतिक्रमण ” करायला लागतात. मग घुसमट ,स्ट्रेस वगैरे !

मुळात माणूस एखाद्या हिमनगासारखा असतो. तो फार कमी दिसतो. आपल्याला समृद्ध करायच्या धावपळीत , गडबडीत आपण अशी नाटकं पाहातो आणि हिमनगाचा दडलेला भाग दृश्यमान होतो का हे चाचपून पाहतो.

याही नाटकात एकटी राहणाऱ्या (भलेही पेइंग गेस्ट सोबत ) आईवर मुलगी “हक्काने (?)” अतिक्रमण करते, तिच्या वतीने आणि स्वतःच्या सोयीचे निर्णय घ्यायला लागते. आणि मग त्याचा “काच “आईला जाणवायला लागतो. माझ्या पत्नीच्या एका सुंदर कवितेत एक जीवघेणी ओळ आहे – ” इतुके आलो जवळ आपण की , जवळपणाचे झाले बंधन ” ! असं काहीतरी या नाटकात होतं आणि “पूर्वीचं” अंतर नव्याने निर्माण केलं जातं.
मात्र दोन्ही प्रमुख पात्रं ” प्रतीक्षा आणि वंदना गुप्ते ” अगदी विरोधाभासी रंगात रंगविली गेली असल्याने नाटक तितके भेदक ,तीक्ष्ण वाटत नाही. आपल्या मुलांनी आपल्याला समजून न घेणे हे जगड्व्याळ दुःख इथेही वंदनाच्या वाट्याला येते.

आयुष्य आधीच कॉम्प्लेक्स होत चाललंय आणि नाती बहुधा त्यात भर घालताहेत. एका क्षणी वंदना एक नवं (खरं तर सर्वपरिचित) सत्य बोलून जाते-
‘ आई -वडिलांनी मुलांवर संस्कार करायचे असतात ,त्यांचे संसार करायचे नसतात.”

माझ्यासाठी याही वयात जीवनाच्या वर्गातील ही शिकवण ! चला , पुन्हा शाळेत प्रवेश घ्यायला हवा !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..