नवीन लेखन...

कृष्णा- कोयना- सख्ख्या बहिणींचा प्रितीसंगम

कराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद. […]

तन डोले मेरा मन डोले : कल्याणजी वीरजी शाह

आपल्याला संगीतातील नेमकं काय आवडतं? गीताचे बोल, गायक-गायीकेचा आवाज, गाण्याची चाल की या सर्वांचा एकूण मेळ? अर्थात नेमकं उत्तर सांगणं तसं अवघडच….कारण सिने संगीतात सर्व घटक मिसळलेले असतात. पण हिंदी चित्रपट संगीतात काही गाणी अशी आहेत की ती वरील घटका शिवाय कायम स्मरणात राहिली आहेत. गाण्याची चाल अर्थातच संगीत दिग्दर्शक तयार करतात मात्र गाणे पूर्णत्वास जाते […]

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा ही एकच अशी यात्रा आहे जिथे तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद सेवा मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते, असं मानलं जातं. प्रतिभा आणि सुधीर चितळे हे गेल्या चार वर्षांपासून ही सेवा देत आहेत. पुण्याहून यात्रेला निघताना चितळे दाम्पत्य आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी घेऊन निघतात. […]

सख्यांसह ‘मुंबई हेरीटेज फेरी’

मी मुंबई एकट्यानं किंवा एक-दोघांना सोबत घेऊन खुप फिरलो. एकट्यानं तर किती भटकलो, त्याची गणतीच करता येणार नाही. पहिल्या पहिल्यांदा कुतुहलाने आणि मग अभ्यासासाठी. एकेका ठिकाणी कितीही वेळा गेलो, तरी दरवेळी नव्यानेच काही तरी सापडायचं तरी किंवा तेच ठिकाणं नव्याने उलगडायचं तरी.. […]

आजा आजा मै हूँ प्यार तेरा : पंचमदा

काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या […]

व. पुं च्या “नवरा म्हणावा आपला” पुस्तकातला हा किस्सा

(वसंत आणि त्याची पत्नी अरुणा यांच्या मधला…वसंताच्या मनातले) पुष्कळदा अस्वस्थ वाटत असलं म्हणजे कुणी तरी अगदी जवळ नुसतं बसावं , किंवा कुणाच्या तरी कुशीत शिरावं हीच माणसाला ओढ असते,हि …इच्छा पुरी होत नाही . तिथंही मन मारावं लागतं.अधूनमधून मला हा आधार लागतो. ह्याची अरुणाला जाणीव आहे. पण आठच दिवसांपूर्वी सहज बोलता बोलता ती शेजारच्या बाईंना म्हणाली,“कुठं […]

आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड

इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून […]

कर चले हम फिदा….: मदन मोहन

युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर […]

युती आणि आघाडी

युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत. […]

1 242 243 244 245 246 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..