नवीन लेखन...

बळींचा प्रवाहो चालला !

“बळींचा प्रवाहो चालला !” या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ११)

जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे. […]

तमसो मा ज्योतिर्गमय !

आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का?? […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १०)

मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या. […]

‘ब…..’

माझ्या गावांत आणि आमच्या बोली भाषेत आईला फक्त ‘ ब ‘ म्हणून हाक मारतात. मी माझ्या आईला जरी आई म्हणत असलो तरी माझ्या सगळ्या काकूंना ब या नावानेच हाक मारतो. खरं म्हणजे आमच्या आगरी संस्कृती मध्ये आजही गावोगावी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मला एकूण चार काका असल्याने आणि एका काकाला दोन बायका असल्याने मला पाच ब होत्या. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ९)

हळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले . […]

कोकण – ग्रीष्माचे आणि पावसाळ्याचे

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते. चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो……. […]

देवा जोतिबा चांगभलं

१९८४ सालातील गोष्ट आहे. अजय सरपोतदार या माझ्या काॅलेजमधील मित्रामुळे त्याच्या वडिलांशी, बाळासाहेब सरपोतदाराशी माझा संपर्क आला. त्यांनी ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाची निर्मिती करुन तो ‘प्रभात’ टाॅकीजला प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती व प्रिमियर शो चे निमंत्रण कार्ड आम्ही केलेले होते. […]

जगणे अमुचे नका विचारू, आम्ही पाखरे भटकी !

असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली. […]

1 204 205 206 207 208 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..