नवीन लेखन...

बळींचा प्रवाहो चालला !

“बळींचा प्रवाहो चालला !”

या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता.

सकाळी काही सामान घ्यायला गेलो होतो. नेहेमीचे तीन दुकानदार विषण्णपणे सांगत होते – ” आम्हीं जातो आमच्या गांवा ! अर्ज केलाय. परवानगी मिळाली की निघू. सगळं कोरोना प्रकरण स्थिरस्थावर झाल्यावर परतू. ”

त्यांच्या बोलण्यातला सन्नाटा भयाण उद्धवस्थतेची नांदी सांगत होता. दोन महिन्यांची अनिश्चित अस्वस्थता भोगत रोज दुकाने उघडून आमच्या दैनंदिन गरजा भागविणारी ही मंडळी – एका फोनवर केव्हांही , काहीही घरपोच आणून देणारी ही मंडळी ,आज मात्र वेगळ्या होष्यमानाला ओ देऊन परतणार आहेत – निर्वासित ? स्थलांतरीत ? विस्थापित ?

माझ्या आजी व्यंकटेश स्तोत्रातील एक ओळ आम्हांला ऐकवीत- (आमचे पाय जमिनीवर स्थिर राहावेत म्हणून ) –

” अन्नासाठी दाही दिशा !
आम्हां फिरविशी जगदीशा !! ”

माझ्या वडिलांनी आयुष्यभर आणि मीही आत्ता आत्तापर्यंत या ओळी अनुभवल्या आहेत.

मला खरंच प्रश्न पडलाय – व्यंकटेश माडगूळकरांच्या भाषेत ही मंडळी “जगायला “इथे आली आणि आता अर्धवट जगून झाल्यावर ” चाला वाही देस कां ?”

माझ्या कथेच्या वरील शीर्षकात (मित्र मध्यवर्ती असल्याने ) मी ” बळींचा ” असा उल्लेख केला होता , पण या पोस्टसाठी प्रश्न पडलाय – काय इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घालू ?

“बळींचा “- रोज रस्त्यावर अपघातात मरणाऱ्या निष्पाप मजुरांचा ?
“प्रवाहो “- लाखावर संख्या गेली तरी सतत वाहता हा प्रवाह म्हणून ?
की
“चालला “- रस्त्यांच्या लांबी-रुंदीला हरवत निघालेल्या तांड्यांचा ??
जगदीशाच्या मनातलं समजेनासं झालंय.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..