नवीन लेखन...

इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर

थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
[…]

सवाई माधवराव पेशवे

सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले. […]

स्वातंत्र्य संग्रामातील विरांगना – मातंगिनी हाजरा

स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी  हाजरा’.   त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात ‘  हाजरा स्ट्रीट’ वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये ‘मातंगिनी  हाजरा’ नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत. […]

डभईची लढाई (भाग पाच)

डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला. […]

तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ

….पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती. या छोट्या ज्युचे नाव होते, एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता. […]

डभईची लढाई (भाग चार)

युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले. […]

डभईची लढाई (भाग तीन)

सरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’. […]

डभईची लढाई (भाग दोन)

बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली. […]

डभईची लढाई (भाग एक)

बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे. […]

वडगावची लढाई

इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शूर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजेकडून मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगावसुद्धा रिकामे करून जाळले होते, आणि पाणवठेसुद्धा विषारी होते. […]

1 3 4 5 6 7 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..