नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

देवभूमीतील पंचबद्री – परिचय

हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात. गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून […]

स्वदेशीची वाटचाल : एक दृष्टिक्षेप

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]

भारतमातेच्या वीरांगना – २० – बसंती देवी

पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला. […]

भारतमातेच्या वीरांगना – 19 – बिना दास

बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले. […]

भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे. […]

देवतात्मा  हिमालय  – भाग 3

हिमालयाचे अनेक तऱ्हेने वर्णन करून सुद्धा कालिदासाला ते अपूर्ण वाटते. आपली प्रतिभा शक्ती हिमालयाचे वर्णन करू शकत नाही ह्याची त्याला खंत वाटते व तो हिमालयाला शरण जातो व आपल्या न्यूनत्वाची जाणीव करून देताना म्हणतो: स्थानो त्वां स्थावरात्मानम विष्णुमाहुस्तथाहि ते । चराचराणां भुतानाम् कुक्षिराधारतां गता ।। प्राचीन संचितामध्ये हिमालय काव्यप्रेरक व काव्यप्रसुही ठरला आहे. पाणिनीनेसुद्धा आपल्या रचनांत […]

पर्यटनातही स्वयंपूर्णतेकडे

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. […]

भारतमातेच्या वीरांगना – 17 – अवंतीकाबाई गोखले

पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला. […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

२२) मांसाहार करावा की नाही? (Is non-veg good): जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते. म्हणून आठवड्यातून एक वेळा मांसाहार घेण्यास हरकत नाही. मात्र मांसाहार शक्यतो […]

भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली. […]

1 55 56 57 58 59 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..