नवीन लेखन...

पर्यावरण

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

मनोगत श्रीगणेशाचे !

|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना?   शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!   वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!   […]

प्लास्टिकला करुया हद्दपार

आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन. […]

कोकणची मुंबई का नको? काही कारणं

माझा आक्षेप आहे तो मुंबईचं माॅडेल डोळ्यासमोर ठेवण्याला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तिची अंतर्गत परिस्थिती पार मोडकळीला आलेली आहे. बाहेरून स्वर्ग दिसणारी मुंबई फक्त २०-२५ टक्के धनिकांची आहे आणि ते ही बाहरून मुंबईत आलेल्यांची. मुंबईत वाहतुकीचे, पर्यावरणाचे, निवासाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मुंबईतील बहुसंख्य स्थानिक कधीच महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर गेलेले आहेत. मुंबईतले उद्योग कधीच उठले आहेत आणि त्याजागी सेवा उद्योग आलेले आहेत आणि तेथे बहुसंख्य बाहेरून आलेले लोक काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतल्या गिरण्या, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथील स्थानिक माणूस मुंबईतच उपरा झालेला असून तिथेच कुठेतरी वाॅचमनची नोकरी करत आहे. ज्या उद्योगांमुळे मुंबई जगभरात प्रख्यात झाली, ते उद्योग प्रदुषणाचं कारण देत मुंबईबाहेर गेलेले आहेत. साधारण २०-२५ वर्षांपू्वी सोन्याचा धुर निघणारा, मुंबईचं इंडस्ट्रीयल हार्ट असणारा सीएसटी रोड आणि ठाणे-बेलापूर रोड आज मोठमोठाले हाऊसिंग काॅम्प्लेक्सेस आणि आयटी-बिपीओ कंपन्यांनी भरून गेलाय. मुंबईची औद्योगिक नगरी बनवणारे सर्व उद्योग मुंबबाहेर जाण्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, हे उद्योग अभे असलेल्या जमिनिंना आलेला सोन्या-रुप्याचा भाव आणि दुसरं म्हणजे ते करत असलेलं प्रदुषण. […]

कोकणची मुंबई; नको रे बाप्पा !

मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे. […]

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी

आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो. […]

कबुतरखान्यांच्या निमित्ताने…

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. […]

एल निनो आणि त्याचे परिणाम !

दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो. […]

वटसावित्री नावाचे विज्ञान !

मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही […]

पाऊस पाहिजे? तापमान कमी पाहिजे?

पाऊस पाहिजे? तापमान कमी पाहिजे? स्वच्छ हवा, पाणी पाहिजे? जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे? इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे? कश्या मिळतील? खालील आकडेवारी वाचा. विचार करा. दरडोई झाडांचे प्रमाण :  १.कॅनडा : ८९५२ झाडे २.रशिया : ४४६१ झाडे ३.अमेरिका : ७१६ झाडे ४.चीन : १०२ झाडे ५.(महान ) भारत : २८ झाडे जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे […]

1 5 6 7 8 9 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..