भूजल साठे का व कसे?
वर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते. […]
शैक्षणिक
वर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते. […]
आपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. […]
लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा… […]
तरुण मुलं जेव्हा खूप खेळ खेळू लागतात तेव्हा आपल्या दोन्ही खांद्यांची भरपूर हालचाल करू लागतात. कोणताही खेळ असो- क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, थ्रो बॉल या सर्वच खेळात खांद्यावर फारच ताण पडतो. उलट्या-सुलट्या उड्या -मारणे, हातावर जोर देऊन काम करणे यात खांद्याला इजा होऊ शकते. खांद्याच्या हाडाला जरी फ्रॅक्टर झाले नाही तरी […]
खरे पाहिले असता हृदय हा एक स्पंदक (पंप) नसून एका आवरणांमध्ये गुंडाळलेला डावा व उजवा असे दोन स्पंदक आहेत. ते एका पडद्याने विभागलेले असतात त्यामुळे त्यातील रक्त एकमेकांत मिसळत नाही. या प्रत्येक स्पंदकामध्ये दोन कप्पे असतात. डावा स्पंदक शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतो व सर्व अवयवांना रक्ताद्वारे प्राणवायू व इतर पोषक द्रव्ये पुरवितो. उजवा स्पंदक सर्व शरीरातून […]
मूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो. सांधेपण आखडतात व दुखतात. व्यायामाने स्नायू व सांधे सुटतात म्हणून व्यायाम महत्त्वाचा. जवळचे बघायला चाळीशीनंतर त्रास होतो. चष्म्याने दृष्टी सुधारते; पण तो […]
कर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. त्यामुळे कर्करोग झाला आहे किंवा तो […]
वाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे. […]
कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांच्या वारशामुळे सिस्टीक फायब्रोसीस, सिकल सेल अॅनिमिया यासारखे रोग होतात. कर्करोग मात्र आनुवंशिक नसून, मुख्यत्वे माणसाच्या जीवनशैलीमुळे होतो, असे दिसून येते. त्यामुळे प्रश्न पडतो, […]
एखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात. या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते. लग्नानंतरच्या दोन वर्षांत या जोडप्याने मूल होऊ न देण्यासाठी कोठचेही कुटुंबनियोजनाचे उपाय मात्र अमलात आणलेले नसावेत. कधी कधी गर्भधारणा होऊन नंतर […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions