नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

कालचक्र

संवाद सारा हरवला आता कुणा कुणासाठी वेळ नाही धडपड फक्त जगण्यासाठी जीवाला कुठेच शांती नाही… जन्मदात्यांचे स्पर्श बोलके ते सुख कधी विसरलो नाही रुजले बीजांकुर संस्कारांचे विद्रोह मनास शिवला नाही. आज संवेदनाच निर्जीवी सहृदयता, उरलीच नाही अतृप्त, हे श्वास अशाश्वत दुजे वास्तव जगती नाही. कालचक्र गतिमान अविरत कुठे थांबावे कळतच नाही जगव्यवहार स्वार्थात गुंतले आपुलेपण ते […]

सावली

जरी मी चालतोही एकटा असे तुमची सावली सोबती धरुनीया बोट जन्मदात्यांचे कृपाळु, चालवितो सुखांती… भेटता सहृद तुम्हासारखे रुजली अंतरी भावप्रीती अरुपाचे रूपडेही आगळे दृष्टांत सावलीत उजळीती… सत्कर्मे अनुभवता दुनिया सावलीत ब्रह्मानंदी तृप्ती… जे जे पेरावे ते तेच उगवते कृतज्ञतेतुनी ओसंडते मुक्ती… अशा भावनांच्या प्रेमादरात सावलीसंगे निर्मली मन:शांती… प्रांजळ प्रेमची सदा देत रहावे फुलवित जावी निष्पाप प्रीती… […]

पाऊसधारा

बरस बरसता, पाऊस धारा मन हे, श्रावण होऊनी जाते… चिंब, चिंबल्या आठवणींची शब्दगीता, अलवार प्रसवते… ओंजळ भावरंगल्या शब्दांची अंतरातुनी मनांगणी पाझरते… ओला ओला हा श्रावण सुंदर तनमनांतर सारे भिजूनी जाते… अवीट आगळी ही श्रावणीगंगा चराचरालाच या शांतवुनी जाते… जणू प्रीतीचेच डोहाळे सृष्टीला दशदिशांना तृप्तीचे भरते येते रचना क्र. ५५ २३/६/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

व्रत मौनाचे

आता सरु लागले आयुष्य हे सारे तरीही तुझे मौन मात्र संपले नाही… कसला हा असा दैवयोग भाळीचा हे गूढ तुझे अजूनही कळले नाही… शब्द तुझे अजूनही कां? अव्यक्त हेच मजला अजूनही उमगले नाही… नव्हते कधीच काहीच मागणे माझे तुजवीण जगणे कधीच रुचले नाही… श्वासासंगे, तुजवरी प्रेम करीत आहे तुला कधीच विसरूही शकलो नाही… तूही हे सारे, […]

कल्लोळ

जगी भेटली माणसे अनभिज्ञ ती सारी… जोडली नाती निराशाच पदरी… नव्हता जिव्हाळा भावशून्य सारी… नाही कुणी कुणाचे छळे सत्य जिव्हारी… जखमांचे झिरपणे नि:शब्द वाहते अंतरी… असले कसले जगणे प्रीत उदास हृदयांतरी… हा कल्लोळ असह्य भावनांचे रुदन भीतरी… रचना क्र ७० १०/७/२०२३ वि.ग.सातपुते. (भावकवी)  9766544908

मन फुलारू

घन आषाढी, गगन सावळे मीलना आसुसलेली वसुंधरा चिंबचिंबला पाऊस ओला स्मृतींच्या झरझरती जलधारा…।। हिरवळलेली सुंदरा अनुपम माहोल लोचना दीपविणारा धुंद क्षण क्षण, मन फुलारू ऋतुवर्षाचा, सोहळा न्यारा…।। जीवा जीवाला झुलविणारा बेधुंद मृदगंधला अवीट वारा प्रीतभावनांचा स्पर्श अनावर अधिर, प्रीतासक्ती गंधणारा…।। शब्दाशब्दातुनी ओढ लाघवी अंतरात झुळझुळतो प्रीतझरा घन आषाढी, गगन सावळे मीलना आसुसलेली वसुंधरा…।। रचना क्र. ६३ […]

अनुरागी अनुबंध

हा जन्मच सारा तुझ्याचसाठी गांठ बांधलेली जन्मोजन्मीची… तुच अशी लाघवी मन प्रीतपरी उलघाल उरी अधीर स्पंदनांची… भावशब्दांची तू पावन गंगोत्री गुणगुणणारी धुन तू बासुरीची…. आत्मरंगला, आत्माराम माझा मोदे गातो गीता या जीवनाची…. हा अव्यक्त, अनुरागी अनुबंध जशी रांगोळी प्राजक्त फुलांची…. रंगगंधता जीव सारा चंदन होतो हीच कृपा कृपाळु त्या अनंताची रचना क्र. ४९ १५/६/२०२३ – वि.ग.सातपुते.(भावकवी) […]

जगरहाटी

आता शब्दमनभावनांना आवरावे टाळावीत मुक्त, मोकळी वक्तव्ये…. दुखावतात मने सहज बोलताना नित्य शब्दमनभावनांना सावरावे…. कुणी कसेही बेमुर्वत इथे वागावे आपण फक्त मौन गिळूनी रहावे…. प्रेम जिव्हाळ्याची नाती रुक्ष आता सहृदयी भावनाच संपली समजावे…. मानमर्यादा, ज्येष्ठत्वही इथे संपले बोलणाऱ्याने आता हवे ते बोलावे…. हीच कलियुगाची सत्य जगरहाटी आपणच समजून उमजून चालावे…. रचना क्र. 13 5/5/2023 -वि ग.सातपुते […]

समाधान

संत तुकारामांच्या अभंगओवीत मानवी जीवनाच संपुर्ण सार पूर्णार्थाने व्यक्त झालेलं आहे. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे आणि म्हणूनच कर्ताकरविता तो एकची भगवंत आहे आणि त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून तो माणूस सुखी समाधानी जीवन जगतो आहे हेच एकमेव सत्य आहे . याचाच अर्थ आपण स्वतः जीवनात सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे. […]

द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना

मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे. […]

1 2 3 4 5 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..