नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

चक्रव्यूह

ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी.  ||१|| ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला.   ||२|| रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या.   ||३|| मंत्री येतां जिवंत प्रेतां बघुन न बघती गोठ्यामधली ढोरें सगळी तशीच ज़गती.   ||४|| चक्रव्यूह रणिं रचला कोणी मुळी न ठाउक […]

जॅक दि जायंट-किलर

उंच उंच आभाळात सरळसोट चढत गेलेला खांब; ढगांना फाडून वरती गेलेला, जादूचा, अर्ध्या रात्रीत उभा झालेला. खांबावर जॅक सरसर चढतो, ढगांच्याही वर, काचेच्या पेंटहाऊसपर्यंत. मऊ मऊ गालिचावर पावलें वाजतच नाहींत, दाणदाण काय, अजिबातच नाहींत. गरम गरम अन्न पुढे येतं, पण जॅकला गिळतच नाहीं. जॅक तसाच उठतो, आणि कुरवाळत बसतो सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. कोंबडीला कुरवाळून, सुरक्षित […]

ढाई अच्छर प्रेम का.. (प्रास्ताविक : ‘प्रीतिगंध’ काव्यसंग्रहाचें)

शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची […]

वाळूत मारल्या रेघा : कुबेर यांची लहानशी, पण चूक

लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या ! पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे. पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी […]

पानिपत

आपापल्या महालात तुम्ही सर्वेसर्वा असता, मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे सरदार असा किंवा शिलेदार. बाहेर पडल्यावर मात्र तुम्ही बनता जगातील कुणीतरी, लहानमोठे. कुणापुढे तरी तुम्हाला झुकावं लागतं . पण , आणखी कुणाला तरी तुम्ही स्वत:पुढे वाकायला लावता . आणि त्यामुळे , फक्त त्यामुळेच , तुम्ही मोठे मोठे बनत जाता – डोंगराएवढे पर्वताएवढे . पण , […]

शिवरायांच्या ‘छत्रपती’ या संज्ञेबद्दल माहिती

 श्री. साळुंखे यांनी ‘मराठी सृष्टी’वर, ‘मला एक प्रश्न पडलाय’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी ‘छत्रपती’ या शिवाजी महाराजांच्या बिरुदाबद्दल चर्चा केली आहे . प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला शिवरायांच्या ‘छत्रपती’ या अभिधानाबद्दल कुतूहल असतेंच. साळुंखे यांनी तो शब्द ‘क्षेत्रपती’ या शब्दापासून निघाला असावा असें मांडलें आहे. त्यांनी दाखवलेला अर्थ सराहनीय आहेच. शिवराय हे ‘श्रीक्षेत्र महाराष्ट्राचें’ […]

मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें. […]

म्हणूं नका

लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]

सुवर्णमहोत्सव राज्याचा : १ मे, २०१०

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]

मुंग्या

मानवाने पाहिले की त्याच्या चारी बाजूंना मुंग्या पसरलेल्या होत्या, मुंग्याच मुंग्या. मानवाने कुतूहलानें पाहिले, आश्चर्याने पाहिले. १ कांहीं वेळानंतर मुंग्या मानवाला चावू लागल्या. मानव बिथरला. त्याने मुंग्यांच्या वारुळाला लाथा मारल्या, धक्के मारले. जमिनीला भेगा पडल्या. मानवाने मुंग्यांवर पाणीच पाणी फेकले, इतके पाणी, जसा कांही प्रलयच. मुंग्यांचे वारूळ मुळापासून हादरून गेले, मुंग्या समूळ नष्ट होऊ लागल्या. मानव […]

1 27 28 29 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..