नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

जगण्याची नाहीं शक्ती (गझल)

जगण्याची नाहीं शक्ती मरण्याची आहे सक्ती ।। कारा जग, मी तडफडतो पण मिळतच नाहीं मुक्ती ।। परमेश्वर साह्य करेना तरि ढळे न माझी भक्ती ।। काळास चकविण्याची मज कळली ना अजुनी युक्ती ।। लढलोही असतो रे, पण हिंमतच मुळी ना रक्तीं ।। नर हतबल भाग्यापुढती मी सार्थ ठरवली उक्ती ।। स्तुति दो शब्दांतच संपे त्यातही असे […]

बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रीयत्व

बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]

वाढले आजार हल्ली (गझल)

माणसें बेजार हल्ली वाढले आजार हल्ली . देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी मांडला बाजार हल्ली . धर्म वेदी, माणसें अज म्हणुन हा गोंजार हल्ली . एक नुरला कार्यकर्ता मात्र, नेते फार हल्ली . लोपल्या पर्जन्यधारा आसवांची धार हल्ली . शत्रुची आतां न भीती दोस्त करतो वार हल्ली . माणसा माणूसकीचा सोसवेना भार हल्ली . ‘भक्त‘ म्हणवत, जन […]

‘चलो इक बार फिर से’ च्या निमित्ताने

गीतें हा हिंदी सिनेमांचा अविभाज्य भाग आहे. विशेषकरून ‘गोल्डन इरा’ म्हणजे १९५० ते १९७०/७५ पर्यंतच्या काळातील सुमधुर गीतांची सगळ्यांना अजूनही भुरळ पडते. त्याकाळी विख्यात संगीतकार होतेच, एवढेच नव्हे तर श्रेष्ठ शायरही कार्यरत होते. त्यामुळे गीतांना नुसतेंच कर्णमधुर संगीतच नाही, तर अर्थपूर्ण शब्दही लाभलेले असत. अशाच एका गीतामधील शायरीचा हा आस्वाद, आणि त्यानिमित्ताने त्याच्या शायरवर एक नजर. […]

रंग दुनियेचे . . (गझल)

हात जेव्हां हे जळाया लागले रंग दुनियेचे कळाया लागले . ठाकतां संकट, पळाल्या वल्गना पायही मागे पळाया लागले . जग दगा देताच, देती नयनही रोखलें, तरिही गळाया लागले . पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें येथलें येथें फळाया लागलें . शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना आंतुनी पण मन मळाया लागलें . पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी […]

मराठवाडा – स्वतंत्र राज्य ?

महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे). श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा […]

मुखवटे (गझल)

भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे ! बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।। रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे थंड काचेतून बघती थंड उडते मुखवटे ।। रोज जे घेती सुपार्या, निजशिशुस नवनीत ते ओळखा, कुठले खरे ते, आणि कुठले मुखवटे ।। भामट्यांचा […]

अजुनही माणूस तूं

हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान तरि होऊं नको त्यापरी स्वीकार कर हें – अजुनही माणूस तूं ।। कधिच तूं बनलास फत्तर, तरि कधी नयनातलें सांगतें जें […]

मदमत्त मुजोर टगे

मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।। दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।। काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।। माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।। मधुनीच हात स्फुरती, पण हाय […]

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती) लेखक : सुभाष स. नाईक मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते. हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल […]

1 26 27 28 29 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..