नवीन लेखन...

चंद्राचं कूळ

चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे. […]

भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी

२००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली. […]

बालनाट्य प्रकार आणि बालनाट्यांची विविधता (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ७)

बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे. […]

मुंबईतील प्रार्थना समाजाची स्थापना

१८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. […]

न बोलताही मन तुझे मला कळले

न बोलताही मन तुझे मला कळले शब्दांचे सांग अर्थ कशास आता हवे व्यक्त मी तुझ्यात हलकेच कधीच झाले मनाचे चांदणे आल्हाद तेव्हा बहरले न बोलताही भाव तुझा मज कळला माझ्या अल्लडपणात मोह तुझा व्यापला बोलतांना मी भाव अलगद बांधले निःशब्द बोल तुझे भाव सांगून गेले न बोलताही तू खूप काही बोलून गेला अलवार स्पर्श तुझा अंतरात […]

कृष्णरंगली राधा

श्रीरंगी रंगात रंगलेली राधा कृष्णा संगती भिजली राधा भक्तीप्रीतीचे रंगरूप अनोखे हरिहरात विरघळलेली राधा द्वैत,अद्वैताचे मिलन सुंदर होळीत रंगली सोज्वळ राधा अतरंगी सावळ्याचीच बाधा कृष्णरुपातुनी दंगलेली राधा धावा कृष्ण! कृष्ण! कृष्ण! हरिपावरीतही स्वरसुरी राधा मनअतरंग होई पावन पावन भक्ती प्रीतीत ओसंडिते राधा — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८५. १८ – ३ – २०२२.

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन

तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्या मुळे त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून ‘इतर’/’तृतीयलिंगी’ व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो. […]

दातृत्व

दान हे सत्पात्री करावं असं म्हणतात. दान हे निरपेक्ष असतं! त्या दान देण्याच्या प्रवृत्तीत कधी अभिलाषा नसते किंवा मीत्व, अहंकार नसतो. दिलेलं दान हे या हाताच त्या हातालाही कळू नये त्यात सात्विक गोपनियता असावी असं म्हटलं जात. […]

दरबार ब्रासबॅण्डचे इक्बाल दरबार

इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत. […]

मी आणि ‘वपु’

एकूण चार कथा त्यांनी सांगितल्या, ज्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. तो ‘श्रवणानंद’ मी कधीही विसरू शकत नाही. त्याकाळी वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट भरुन मिळत असतं. मी देखील सोनीची कोरी कॅसेट देऊन भरुन घेतली होती. […]

1 2 3 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..