नवीन लेखन...

धीरूभाई हिराचंद अंबानी स्मृतिदिन

यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. […]

स्मार्ट इंजिन

आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.
[…]

गोळी

लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. ‘तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन’ असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो. […]

‘गंधर्व नाटक मंडळी’चा स्थापना दिन

चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली. […]

परिसस्पर्श… (मी आणि ती कथा)

इतक्यात मला ती दिसली.. गावाकडे पहिली होतो.. आता ओळखू येत नव्हती.. कोणत्या साहेबाची , कृपा ‘ झाली कोण जाणे. मी तिच्या समोरच होतो… तिनेही रोखून बघीतले आणि मला ओळखले.. […]

स्टीवर्ड

रात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली. […]

पोस्ट-कार्ड

मी क्षणार्धात भूतकाळात गेलो. १९८३ साली अनेक दिवाळी अंकांचे काम केले होते. त्यामुळे पोस्टमनची घरी रोजचीच चक्कर होत असे. कधी पत्रं तर कधी दिवाळी अंकाचे पार्सल पोस्टाने येई. त्या दिवाळीला आलेल्या दोघां पोस्टमनच्या हातावर ‘पोस्त’ची रक्कम देताना मला अतिशय समाधान वाटलं होतं आणि या वर्षी कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने मी लाॅकडाऊनमध्ये घरात बसून काढले. […]

स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन

Give me Hundred Nachiketa, I will Change the World असे अभिमानाने सांगणारे स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना‘विवेकानंद’असे नाव दिले. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चमात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला.
[…]

जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन

सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. […]

1 24 25 26 27 28 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..