नवीन लेखन...

टॅक्सीवाल्याची शिकवण – मन की बात..

केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो.

मन की बात..

‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध झाला आणि माझ्या पुणे, नगर येथील परिचितांच्या प्रतिक्रीयांचा ऐन थेडीत सकाळापासून भरभरून पाऊस पडला..

छापून आलेलं असं काही हे माझं पहिलंच नाही. गेली दोन वर्ष माझ लिखाण महाराष्ट्रात कुठं न कुठं छापून येतंच आहे. परंतू काहीतरी माझ्या नांवाने छापून येतंय आणि ज्ञात-अज्ञात वाचक माझे शब्द वाचतायत याचा मला होणारा आमंद माझा पहिला लेख छापून आला होता तेंव्हा झाला होता तेवढाच आजही आहे.

जग कितीही रंगीत झालेलं असलं तरी काळ्या-पांढऱ्याची (ब्लॅक अॅन्ड व्हाईट) जादू आजही कायम आहे. लिहित्या हाताला तर ही जादू आणखी मोहवते. आपलं काही पांढऱ्या कागदावर काळ्या शाईत छापून येणं ही आजही जगभरच्या नामवंत लेखकांच्या दुनियेत अभिमानाची बाब असते तिथे माझ्यासारख्या नवख्या लेखकाचा आनंद काय वर्णावा..! मग भले त्या लिखाणाचं आयुष्य काही तासाचं का असेना..कोणीतरी दूरचं ते वाचतंय आणि त्या मनाला ‘ह्या हृदयीचं त्या हृदयी’ भिडतंय ह्यापेक्षा मोठी आमंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही..

कि-बोर्ड आणि स्क्रिन पाहात मोठ्या झालेल्या नविन पिढीला कदाचीत कागद आणि लेखणीचं नातं चटकन कळणार नाही. पण ज्या दिवशी त्यांना हे नातं उमजेल त्या दिवशी ती पिढी ‘मॅच्युअर्ड’ झाली असं मानायला हरकत माही..दुनिया कितीही पेपरलेस झाली तरी पेपरची जादू या जगाच्या अंतापर्यंत ओसरणार नाही..

एशियाटीक लायब्ररी ते चर्चगेट स्टेशन हा टॅक्सीने जेमतेम १५-२० मिनिटांचा प्रवास. पण हा प्रवास इतका समृद्ध आणि इतक्या दूरचा होईल याचा मला कल्पनाच नव्हती..पुणे, नगरच्या या अदृष्य प्रवासात टॅक्सीवाला टॅक्सी चालवत होता पण त्यावा रस्ता दाखवला माझे आजपर्यंत कधीही न पाह्यलेले असेच कलंदर मित्र श्री. आशिष पेडणेकर यांनी.

श्री. पेडणेकरांचा परिचय पूर्वीचा असला तरी तो ‘व्हर्च्युअल’ होता. सोशल मिडियावर आपण मारे एकमेकांचे ‘मित्र’ वैगेरे असतो पण तो मित्र कुठे राहातो, काय करतो हेच माहित नसतं..माझं आणि पेडणेकरांचं तसंच झालं. आता इतक्या महिन्यांनंतर कळलं की ते माझ्या शेजारीच दहिसरला राहातात म्हणून..! किती जवळ? तर, अगदी माझ्या घरातून जोरात शिटी मारली की त्यांना ऐकायला जाईल, इतक्या जवळ..! सोशल मिडिया, टेक्नाॅलांजी यांनं जग छोटं झालं असं म्हणतात पण ते तितकंच झूठही आहे असं मला वाटतं..जग अंतरा-वेळेने छोटं झालंही असेल पण माणसा-माणसातलं अंतर मात्र वाढलंय हे खरं..

माझ्या प्रवासाची ती १५-२० मिनिटं समृद्ध करणाऱ्या त्या अनाम टॅक्सीवाल्याचे आभार मानतो आणि थांबतो..

मुळ लेख वाचला नसल्यास जरुर वाचा… 

 

— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..