नवीन लेखन...

किचन क्लिनीक – मिरी

कपाळावर मिरी वाटणे हा वाक्प्रचार तर सगळयांनाच माहीत असणार त्यात काही नवल नाही.मसाल्या मधला अजून एक पदार्थ ज्याला मसाल्या मध्ये मानाचे स्थान आहे ती म्हणजे मिरी.

आपल्या रोजच्या जेवणात आमटी मध्ये,गरम मसाला बनवताना मिरीचा सर्रास वापर केला जातो.असा हा तिखट झणझणीत पदार्थ जेवणाला एक वेगळीच लज्जत आणतो.

मिरीचा वेल असतो आणी त्या वेलीला उगवणारी ही फळे चांगली तयार झाल्यावर उन्हात वाळवून ठेवली जातात.ही चवीला तिखट असतात आणी ब-या पैकी उष्ण असतात.हि शरीरातील कफ आणी वात दोष कमी करते पण पित्त मात्र वाढवते.

चला आता मिरीचे काही घरगुती औषधी उपयोग पाहूयात.

१)घसा बसला असल्यास जेवणानंतर १/४टिस्पून मिरपुड तूपात मिसळून खावी चांगला फायदा होतो.

२)सर्दी होऊन डोके देखील जड झाले असल्यास १/४ चमचा मिरपुड मधासोबत मिसळून घेणे आराम मिळतो.

३)पोटात दुखत असल्यास १/४ चमचा मिरपुड आणी २ चिमूट भाजलेला हिंग हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.

४)मार लागून रक्त साखळले असल्यास मिरी पाण्यात वाटून त्याचा लेप त्या जागी लावला असता तिथली सूज आणी वेदना देखील कमी होते.

५)मिरीचे चूर्ण किडलेल्या दाढेत ठेवले असता तिथला ठणका कमी व्हायला मदत होते.

अतिवापराने छातीत जळजळ,पोटात आग होणे तसेच संडास,लघवी ,व नाकातून रक्त स्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..