नवीन लेखन...

बॉलिवूडचा बादशहा – राजकुमार

आज ८ आक्टोबर
आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या मा.राजकुमार यांची जयंती
जन्म: ८ आक्टोबर १९२६

विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी मा.राजकुमार यांची ओळख होती. यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी त्यात तो प्रभावीदेखील ठरला. उदा. कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’मध्ये ते मीनाकुमारीला म्हणतात, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ तर कधी ते व्यक्तिरेखेबाहेर येऊन राजकुमारढंगात संवाद बोलू लागले. मर्यादा, चंबल की कसम, बुलंदी, दिल का हीरा, कर्मयोगी अशा चित्रपटांत तसा प्रत्यय येतो. पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्यांची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्यांना स्वातंत्र्य देतात असे जाणवू लागले. आणि याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्यांचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. त्यांच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला.

‘जेमिनी पिक्चर्सच्या ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये तो तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकले. तेव्हा ही तोच आत्मविश्वास होता. तो कुठेही कमी पडला नव्हता. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन आहे हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, राजकुमार हा राजकुमारसारखा जगला मा. राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ यांचे निधन झाले. आपल्या समुहाकडून मा. राजकुमार यांना आदरांजली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..