नवीन लेखन...

भुयारी रेल्वे

खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही. […]

पुस्तक

मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली. […]

बेवारशी

प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो. […]

वेडेपणातलं शहाणपण

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण? […]

भुयारी

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला. […]

बंदिस्त

अशा आजीबाई आणि आजोबा आज बऱ्याच घरात बंदिस्त आहेत. पूर्णवेळ नोकर मिळत नाहीत, ठेवता येत नाहीत, परवडत नाहीत, मग अशा वृद्धांना घरात ठेवून, कुलूप लावून घराबाहेर पडणारे महाभाग खूप आहेत. […]

कलकलाट

आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे. […]

अनोळखी

काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा. […]

खिडकीपलीकडे

दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते.  […]

पावसाचं आगमन

पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..