नवीन लेखन...

श्रीहरी स्तुति – ४१

रागामुक्तं लोहयुतं हेम यथाग्नौ
योगाष्टाङ्गैरूज्ज्वलितज्ञानमयाग्नौ।
दग्धात्मानं ज्ञं परिशिष्टं च विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४१।।

भगवंत प्राप्ती होईपर्यंत, परमानंद स्वरुपाची प्राप्ती होई पर्यंत मानवी जीवनाची वाटचाल कशा प्रकारची असावी? किंवा कोणत्या मार्गाने या पदाची प्राप्ती होते हे सांगताना प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री एक अत्यंत सुंदर उपमा दिलेली आहे.

मानवी जीवन म्हणजे जुन काही एखादा सुंदर सोन्याचा दागिना आहे अशी सुंदर उपमा देत त्या उपमेचे सौंदर्य उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
रागामुक्तं लोहयुतं हेम यथाग्नौ – लोखंडाने युक्त असणारे सोने जसे अग्नीत टाकल्यानंतर त्यातील सर्व राग म्हणजे मिसळलेले रंग, डाग, कचरा इ. सर्व निघून जाते.
केवळ शुद्ध सोने शिल्लक राहते.
योगाष्टाङ्गैरूज्ज्वलितज्ञानमयाग्नौ
दग्धात्मानं – त्याप्रमाणे अष्टांग योगाने अग्नीला प्रज्वलित करून, ज्ञानरूपी अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेऊन,
आपल्या मध्ये असणाऱ्या अविद्येचा संपूर्ण नाश केल्यानंतर,
ज्ञं परिशिष्टं च विदुर्यं – शिल्लक राहिलेल्या परम अशुद्ध अशा ज्ञानस्वरूपाला जाणून घेतले जाते.
सोने मूलतः अत्यंत शुद्ध असते. मात्र त्या सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर त्यात काही अंशी का होईना पण डाग मिसळवावा लागतो. असे डाग लावलेले सोने अग्नीत टाकल्यानंतर हा डाग जसा जळून जातो त्याप्रमाणे या संसारात जीवाच्या ईश्वरी चैतन्यावर साचलेला अविद्येचा मळ अष्टांग योगाने जागृत केलेल्या ज्ञानाग्नीमध्ये जळून गेल्यानंतर ज्या परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..