नवीन लेखन...

श्रीहरी स्तुति – ३६

नाहं प्राणो नैव शरीरं न मनोऽहं
नाहं बुद्धिर्नाहमहंकारधियौ च।
योऽत्र ज्ञांशः सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३६।।

प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्‍या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते.

उदाहरणार्थ प्राण म्हणजे चैतन्य म्हणावे तर त्यांचे आवागमन चालत असते. शरीरात त्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त होते. काही भागात प्राण अर्थात वायू दाटून राहतो. काही भागातील प्राण म्हणजे चलनवलन शक्ती नष्ट होते. अशा प्रकारचे विविध विकार प्राणांच्या ठिकाणी संभवतात. या दृष्टीने विचार केला तर जे विकारशील आहे ते आत्म चैतन्य असू शकत नाही यादृष्टीने प्राण म्हणजे आत्मा नाही हे सिद्ध होते.
अशा स्वरूपात अन्य सर्व तत्त्वांचा विचार ज्यावेळी साधक करतो त्यावेळी त्याची जी भूमिका असते ती भूमिका मांडताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,

नाहं प्राणो – मी प्राण नाही
नैव शरीरं – ना शरीर आहे
न मनोऽहं- ना मी मन आहे.
नाहं बुद्धिर्नाहमहंकारधियौ च – ना मी बुद्धी आहे. ना मला कळले या स्वरूपातील बुद्धीच्या ठिकाणी निवास करणारा अहंकार मी आहे.
योऽत्र ज्ञांशः सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं – या सगळ्यांची ज्याला जाणीव होते तो चैतन्य अंश मी आहे, अशा स्वरूपात साधक ज्याला जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..