नवीन लेखन...

खंत

इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये
त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये
फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली
वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये
किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले
एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये?
शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी
गोष्ट अर्धी राहून जाईल इतकं अबोल होऊ नये
एकच आहोत आपण मनानं हेही मान्य आहे मला
स्वप्नवर्खी स्पर्शानाही इतकं कमी लेखू नये
माझी कविता माझ्याचपाशी पाकळी पाकळी मिटत गेली
क्षण निसटून जातील इतकं लज्जे, आड येऊ नये !

सौ. राजलक्ष्मी देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..