नवीन लेखन...

गुंतवणूक बाजार

अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच . २०२० च्या सुरुवातीलाच आर्थिक क्षेत्रात जी पडझड या कोरोनामुळे झाली त्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय पूर्णपणे बदलले . किंबहुना असेही म्हणता येईल की मध्यम व उच्च मध्यम वर्गास हे पर्याय सक्तीने बदलावे लागले . आतापर्यंत हा वर्ग व मुख्यत्वे करून निवृत्त वर्ग हा सुरक्षित ठेवी व वेळेवर मिळणारे व्याज यासाठी बँकांना अग्रक्रम देत होता . त्यांच्या घरचे नियोजन हे मिळणारे व्याज , मुदत ठेवींवर एकरकमी चांगल्या व्याजासह मिळणारी रक्कम यावर ठरत होते . बँकांविषयी आत्मीयता होती . पण कोरोनाचे झंझावाती आगमन अनपेक्षितपणे झाले .. आणि वाऱ्याच्या झोताने नारळाच्या झाडावरून धडाधड नारळ पडावे तसे बँकांचे व्याजदर खाली आले व अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे . त्यात काही बँकांनी नको ते फ्रॉड केले आणि बँकिंग क्षेत्र गुंतवणुकीसाठी पाठी ढकलले गेले . आता फक्त बँकांमधील गुंतवणूक राहू शकते . बँकांनी उत्पन्नासाठी सुरू केलेले अनेक चार्जेस यामुळे गुंतवणूक हा टॉप ऑप्शन बदलला आहे . DICGC चे वाढलेले कव्हर हा फक्त एक दिलासा सुरक्षिततेचा .

मग आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय कुठले ? यासाठी आपणाकडे सकारात्मक परिस्थिती आहे ती म्हणजे –

१. आजकाल सर्व युवा पिढी व नोकरदार , व्यावसायिक , हे computor savy झाले आहेत . चांगल्या तऱ्हेने लॅपटॉप , मोबाईल वापरू शकतात . उलट मोबाईलवर काम करणे सोपे झाले आहे . पेन ड्राईव्हमध्ये आर्थिक व्यवहार जतन करून ठेवता येतात , प्रिंटाऊट घेता येतो . बँका म्युच्युअल फंड , शेअर ट्रेडिंग सर्व दुनिया मेरी मुठ्ठी में !! शिवाय चोवीस तास सेवा .

२. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कायदे . गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी ( Investors
Protection ) SEBI ACT 1992 , Security Contract Regulation Act 1956 हे दोन कायदे महत्त्वाचे आहेत . गुंतवणूकदारांना या कायद्यांमुळे संरक्षण तर मिळतेच परंतु फसवणूक देखील होत नाही .

३. हल्ली सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी तरुण पिढी शेअर ट्रेडिंग करणे फायद्याचे समजते . त्यामुळे सर्व जण बँक बचत खात्याबरोबर DMAT खातेही उघडतात . योग्य मार्गदर्शन मिळवतात . यातही व्यवहार मोबाईलद्वारे करता येतात ही मोठी सोय आहे . आपण KYC NORMS पूर्ण केले की DMAT खाते सुरू करता येते . बँकांचे help desk चोवीस तास उपलब्ध असतात . आपल्या अडचणींचे निवारण ते त्वरित करतात .

४. SEBI ACT नुसार शेअर ट्रेडिंग , म्युच्युअल फंडांचे सर्व व्यवहार Contract Note द्वारे email व कुरिअरने कळवले जातात . गुंतवणूकदारास ते त्वरित तपासता येतात .

५. मुख्यत्वे करून टीव्हीवर आर्थिक व्यवहारांसंबंधी अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत . त्यातल्या त्यात CNBC – AWAZ , Zee BUSINES ही चॅनेल्स २४ तास उपलब्ध असतात . त्यात अनेक बाबींचे मार्गदर्शन केले जाते , सल्ला दिला जातो , यशस्वी गुंतवणूकदारांच्या मुलाखती घेतल्या जातात . याचा गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो . SEBI तर्फे मार्गदर्शन मेळावे , सेमिनार्स आयोजित केले जातात . त्यांचे Investors Education Department कॉलेजेस , संस्थांना विनामूल्य लेक्चर्स देतात . या सकारात्मक बाबींवर गुंतवणूक पर्यायांचा विचार करता येईल .

बँकांनंतर हा योग्य पर्याय आहे . यात गुंतवणूक थोड्या काळासाठी ( Short Period ) नफा कमवण्यासाठी व दीर्घ मुदती ( Long Term ) साठी करता येते . मात्र यासाठी धीर असणे अत्यावश्यक आहे . शेअर मार्केट हे कधीही बदलणारे मार्केट आहे . नफा मिळेल पण वेळ आली तर तोटाही सहन करण्याची मनाची तयारी हवी . दुसऱ्या शब्दात धोका पत्करण्याची आणि या संबंधी basic knowledge ही पाहिजे . जसे जसे ज्ञान वाढेल तसे तसे Intra Day / Delivery / Derivatives व्यवहार करता येतात .

यासाठी बँकेत किंवा ब्रोकरकडे DMAT खाते उघडणे आवश्यक आहे .

दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक . ज्यांना शेअर ट्रेडिंग करणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे . आता तर प्रत्येक बँक , आर्थिक संस्था या क्षेत्रात आहेत व येत आहेत . गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे कारण

१. बँक व्याजदरापेक्षा यात परतावा जास्त मिळतो . बहुतेक फंड हे व्याजदरापेक्षा जास्त उत्पन्न देतात .

२. असे फंड अत्यंत तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून ( Fund Managers ) नियंत्रित केले जातात . आर्थिक क्षेत्राचा त्यांचा अनुभव असतो व शेअर बाजाराचा ट्रेंड बघून ते त्वरित निर्णय घेतात . ज्यामुळे फंड फायद्यातच आहेत . ग्राहक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे व वाढवणे अशी मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते .

३. SEBI ACT नुसार प्रत्येक म्युच्युअल फंडला दरमहा त्यांचा Investment Portfolio प्रसिद्ध करावा लागतो . तसेच फंड गुंतवणूकदाराला email द्वारे माहिती द्यावी लागते . ते बघितले तरी आपली गुंतवणूक फायद्यात आहे की नाही हे समजते व अपेक्षा पूर्ण होत नसेल तर फंडमधून बाहेरही पडता येते .

४. प्रत्येक फंड गुंतवणूकदारास जेव्हा लागेल तेव्हा किंवा दरमहा डिटेल स्टेटमेंट पाठवतात . त्यात आतापर्यंतची गुंतवणूक , किती युनिट्स आहेत , त्याची नक्त किंमत ( Net Asset Value ) कळवतात . त्यातच रक्कम काढण्याचा / वाढवण्याचा फॉर्मही दिला जातो . आणि मुख्य म्हणजे हे सर्व ONLINE होते .

५. यातील व्यवहार हे पारदर्शक असतात . ( काही अपवाद वगळता ) . आकडेवारी , ग्राफ , सिग्नल्स यातून सर्व माहिती मिळते . तर म्युच्युअल फंड असो वा शेअर ट्रेडिंग धोका दोन्हीतही असू शकतो व तसे Disclaimer Statement प्रत्येक जाहिरातीत , मीडियात दाखवले जाते . तेव्हा हा निर्णय स्वजबाबदारीवर घ्यायचा असतो .

आपले आवडते लेखक व . पु . काळे म्हणाले होते , ‘ आपण मध्यमवर्गीय लोक जेव्हा सोने खरेदी करतो तेव्हा आपला चेहरा आनंदाने फुललेला असतो , मात्र जेव्हा काही कारणामुळे सोने विकायची वेळ येते तेव्हा ती घटना अत्यंत क्लेशकारक असते . ‘ पण आता हे दुःख राहिले नाही , कारण GOLD ETF फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सोने घेऊन ते electronic स्वरूपात ठेवू शकतात . विकायचे तेव्हा मार्केट रेट व कुठलीही घट नाही ! मेकिंग चार्जेस नाही ! सोने मोडल्याचे दुःख नाही !!! सोन्याच्या वाढत्या किमती बघता दीर्घकाळासाठी हा उत्तम पर्याय आहे .

Income Tax वाचवणे हे तर आपले उद्दिष्ट , यासाठी टॅक्स सेविंग्ज फंडस् , डिपॉझिट्स योजना असतात . पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड अकाउंट , टॅक्स बचतीसाठी चांगले . पण १५ वर्ष थांबण्याची तयारी पाहिजे आणि मुख्य म्हणजे १५ वर्षानंतर रुपयाची किंमत काय असेल ? कमीतकमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १,५०,००० रुपये यात गुंतवता येतात . NSC / किसान विकास पत्र यांची लोकप्रियता कमी झाली आहे .

मग विचार येतो कुठे गुंतवणूक करावी ? यासाठी अनेक वृत्तपत्रात मान्यवरांचे अभ्यासपूर्ण , आकडेवारीसह लेख असतात ते जरूर वाचावे . काही संस्था विनामूल्य सेमिनार घेतात , चांगली माहिती देतात . ते अटेंड करावे .

दुसरा पर्याय , FINANCIAL ADVISOR ( गुंतवणूक सल्लागार ) यांचा सल्ला घ्यावा . हा एक व्यावसायिक मार्ग आहे . ज्यांना मोठी गुंतवणूक करायची आहे त्यांना असे सल्लागार पुढील ५ – १० वर्षांची व १ ते ५ वर्षांची गुंतवणूक कशी , कोठे करावी याचा सल्ला देतात . मात्र त्यांची फी , त्यांची जनमानसातली प्रतिमा , प्रामाणिकपणा , नीतिमत्ता बघून मग व्यवहार करावा . सहसा असे सल्लागार चुकीचा सल्ला देत नाहीत . म्हणून कायम त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये रहावे .

तर असा आहे हा गुंतवणूक बाजार …

— अरविंद खडमकर

( माजी मुख्य प्रबंधक , स्टेट बँक ऑफ इंडिया )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..