नवीन लेखन...

Immunity साठी कामधेनू

ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते . दूध हे अमृत आहे . अर्थातच देशी गायीचे दूध असेल तरच ते अमृत आहे . जर्सी , हॉस्टीन अशा प्रजातींचे दूध हे विष स्वरूप आहे . ` Devil in the milk ‘ या पुस्तकात शास्त्रज्ञांनी तसे प्रयोगांनी सिद्ध केले आहे .

देशी गायीच्या दुधामध्ये C.L.A. हा घटक असतो . या Conjugated Lioninc Acid Cerebrocide यामुळे मेंदूच्या पेशींची ( D.N.A ) ची झीज होण्याचे प्रमाण कमी होते . त्यामुळे स्मृती , बुद्धी , मेधा , जरा , नेत्र व इंद्रिय शक्ती या दीर्घकाळपर्यंत शाबूत राहतात . शिवाय C.L.A. मुळे शरीरातील Cholesterol चे प्रमाण नियंत्रित राहते . हे गायीच्या दूधाचे वैशिष्ट्य केवळ देशी म्हणजेच भारतीय वंशाच्या गायींमधेच आढळून येते .

देशी गायींच्या पाठीवर ( hump ) उंचवटा असतो व त्यामध्ये ‘ सूर्यकेतू ‘ नाडी असते . त्यामुळे रानात चरताना सूर्याची उष्णता त्यामध्ये शोषून घेतली जाते व गायीचे आंत्र देखील लांबीने मोठे असते . त्यामधील बत्तीस प्रकारच्या enzymes द्वारे , पचन होऊन अमृततुल्य दूध , गोमूत्र व गोमय याची निर्मिती होते . दुधापासून विरजण लावून दही , दह्याचे ताक व ताकाचे लोणी , या लोण्यापासून कढविलेले तूप हे श्रेष्ठ दर्जाचे असून रसायन , बल्य , डोळ्यांना हितकारक , स्वर , वर्ण , प्रभा वाढविणारे असते . गायीपासून मिळणाऱ्या या पाचही घटकांना मिळून ‘ पंचगव्य ‘ असे नाव आहे .

आधुनिक शास्त्रानुसार परीक्षण केल्यावर या पंचगव्यात डोळ्यांसाठी उपयुक्त असा carotine घटक , Vit . D , Vit . B12 आढळून आले . तसेच गायीचे तूप , गोमूत्र , दूध हे immuno modulator आहे असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले . यासाठीची विविध पेटंट पण घेण्यात आली आहेत . Immunization , Immunity हे शब्द ‘ करोना’च्या काळात खूपच प्रचलित झाले आहेत . किंबहुना घासून गुळगुळीत झाले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . पण Immunity वाढते म्हणजे ? आज प्रतिकारशक्ती वाढण्याची गोळी , औषध , health suppliment घेतली व उद्या लगेच Immunity वाढली असे होत नाही . ‘ पी हळद हो गोरी ‘ असे घडणारी Immunity ची गोष्ट नाही . व्याधिक्षमत्व हे जन्मापासून वार्धक्यावस्थेपर्यंत आहार , विहार , दिनचर्या , ऋतुचर्या या life style वर अवलंबून आहे .

प्रतिकारशक्ती व व्यधिक्षमत्व या विषयी आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा अग्नी / जाठराग्नीशी संबंधित आहे . जाठराग्नी ( म्हणजे शरीरात असणारी पचनशक्ती ) , पंचमहाभूताग्नी , धात्वाग्नी अशी पचनाचे संदर्भाने विशाल संकल्पना आयुर्वेदात वर्णन केली आहे . आहाराचे पचन हे अग्नीच्या बलावर अवलंबून असते . जसे चुलीतला अग्नी पेटता राहणेसाठी लाकूड हे इंधन ( म्हणजे आहार ) वापरले जाते , तसे जाठराग्नीसाठी आहार हे इंधन होय आणि या आहारात अग्नी तत्त्व असणे फार आवश्यक आहे . तरच आहाराचे पचन उत्तम होते . या पचनानंतर आहाररस , रक्त , मांस असे शरीर धारण करणारे शरीर घटक निर्माण होतात . शरीर व मन प्रसन्न बनते व व्यक्ती स्वस्थ होतो . पर्यायाने त्याचे व्याधिक्षमत्व उत्तम राहते . म्हणून आहार हा षड्रस ( मधुर , आम्ल , लवण , कटू , तिक्त , कषाय ) युक्त व मधुर रस प्रधान असावा . असा पूर्णान्न आहार म्हणजे ‘ देशी गायीचे दूध ‘ व पंचगव्य होय . त्याचे वर्णन करताना चराकादि आचार्य ‘ अत्र गव्यं जीवनीयं रसायनम् ‘ । असे म्हणतात . म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा देणारे व रसायन म्हणजे शरीरातील सर्व अवयव घटक पेशींचे बल , ताकद कायम राखणारे .

क्षीर घृताभ्यासा रसायनानाम् । ( च.सू. २५/४० ) दूध व तुपाचे नियमित सेवन हेच रसायन आहे उपवासाध्वभाष्यस्त्रीव्यायातपकमीभः ।
कलान्तानायनुपानार्थं पयः पथ्यं यथामृतम् ।।
आज सर्वांचीच life style ही धावपळीची आहे . यामध्ये वाहनांनी प्रवास , उभे राहून स्वयंपाक , कामे , प्रवास करणे , फोनवर खूप बोलणे , stress , विचार करणे या सर्वानी क्लांत झालेल्यांसाठी दूध अमृताप्रमाणे काम करते . मधुर चवीचे , शीत , स्निग्ध दूध हे ओजाच्या गुणांप्रमाणेच आहे . त्यामुळे ते रसायन काम करते . वरील सर्व प्रकारे शरीराची झीज होत असताना , शरीराला धारण करणारे म्हणजे शरीराचे बल , ताकद टिकवून ठेवणारे , नवीन पेशींची उत्पत्ती होताना त्यांना ताकद देणारे असे देशी गायीचे दूध आहे हे त्याच्या गुणांवरूनच लक्षात येते . म्हणूनच गायीच्या दुधाला मातृस्तन्याच्या अभावी उपयोगात आणण्याची परंपरा आहे . आता आधुनिक कसोट्यांवर देखील मातृस्तन्य व देशी गायीच्या दुधाच्या घटकांची तुलना करून त्यातील साधर्म्य दाखविले जाते आहे . मातृस्तन्याच्या अभावी गायीचे दूध बालकाला पूरक ठरते . ते सर्वांनाच आजन्म सात्म्य आहे .

प्रतिकारशक्ती ही गर्भावस्थेतच , मातेच्या उदरात असताना बालकाला मिळते . वृद्धावस्थेपर्यंत ते व्याधिक्षमत्व टिकविण्याची जबाबदारी वैयक्तिक असते . यासाठी दैनंदिन आहार , व्यायाम , निद्रा , ब्रह्मचर्य या घटकांचे शास्त्रीय दृष्टीने पालन करणे गरजेचे आहे . रोज शरीराची झीज होत असते , रोज नवीन पेशी शरीरात निर्माण होतात असे wear & tear चे चक्र शरीरात सुरू असते . अव्याहतपणे ! मग अशा शरीराचे नियमन करायचे तर रोज immunity ची गोळी खायची का ? की नवीन आजार आला की त्या प्रत्येकाची लस टोचून घ्यायची ? ही सुज्ञास विचार करावयला लागणारी बाब आहे . आयुर्वेदाने म्हणूनच आहाराचा विचार व पचनशक्तीचा विचार विस्तृतपणे सांगितला . व यामध्ये नित्य दूध व घृत / तूपाचे सेवन करण्याचा आदेशच दिला आहे .

सर्व स्नेहांत्तमं सर्पि … वयसः स्थापनं परम् ।
( अ.ह.सू. ५ ) मंथन प्रक्रियेने तयार केलेले तूप ( लोणकढे तूप ) हेच श्रेष्ठ आहे . जसे जसे तूप जुने होत जाते तसे ते अधिक श्रेष्ठ होते . श्रेष्ठ म्हणजेच शरीरातील सूक्ष्म इंद्रिये , ज्ञानेंद्रिये येथपर्यंत पोहोचण्याची , त्यांचे व्याधिक्षमत्व वाढविण्याची घृतात शक्ती निर्माण होते . Blood Brain Barrier ( BBB ) ही पार करून मेंदूपर्यंत ताकद देण्याचे काम गायीच्या घृतामुळे होते आहे . या घृताचे रसायन , वयस्थापन असे काम होताना , मेंदूतील DNA Damage ची प्रक्रिया हळूहळू कमी होते . Nervous System ची झीज भरून निघते . त्यामुळे वार्धक्यावस्थेत होणारे स्क्रिझोफेनिया , Parkinsons असे वाताच्या प्राबल्याने होणाऱ्या अनेक आजारांवर उपाय करता येतो . त्यांना प्रतिबंध करता येतो . मेंदूच्या nervous system द्वारे ज्या वातवह नाड्यांमार्फत ‘ प्राणा’चे पूरण चलन होते त्याचा मुख्य स्रोत घृतामध्ये आहे .

प्राणमिती प्राणहेतुत्वात् यथा – आयुर्घृतम् ‘

चक्रपाणि
Immunity च्या बाबत , संशोधनात असे सिद्ध झाले आहे की , Immunity वाढविणारी जी द्रव्ये आहेत त्यामध्ये anti oxident घटक असतात व Vit . C , E , B Complex , Bio flavonoids व असे काही घटक या anti – oxident defence मधे महत्त्वाचा भाग घेतात . मुख्यत : free – radical चा नाश होणे थांबवितात व त्यामुळे immuno – modulator effect मिळतो . यामुळे पेशींच्या DNA मधील chromozome ची रचना , कार्ये यामध्ये व्याधींमुळे झालेले दुष्ट / वाईट परिणाम दूर होऊन पेशी त्यांचे योग्य कार्य संपूर्ण ताकदीने करू लागतात . असे समजण्याच्या भाषेत सांगता येते .

घृताबरोबर दही , लोणी , ताक यांचा आहारात उपयोग हा पचनशक्ती व व्याधिक्षमत्व वाढविण्यास आवश्यक आहे . फक्त मंथन प्रक्रिया , विरजण पद्धत यांचा अवलंब यासाठी केला तरच प्रतिकारशक्ती वाढण्याचे परिणाम दिसतात . शास्त्रामध्ये दही , लोणी , ताक सेवनाचे नियम सांगितले आहेत . आहाराचे पचन आतड्यात होते व तेथे पचनास मदत करणारे सूक्ष्म जीव असतात . हा bacterial flora maintain करण्याचे काम ताकाने होते , दह्याने व लोण्याने होते . म्हणूनच ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे . शरीराचे बल हे व्याधिक्षमत्वासाठी महत्त्वाचे आहे . देशी गायीच्या ताज्या लोण्यांमध्ये बल , देण्याची क्षमता आहे . तुष्टी पुष्टी लोण्याच्या सेवनाने मिळते . तसेच बुद्धि – वर्धन करणारे देखील लोणी आहे . बाळकृष्णाची लोणी खातानाची छबी सर्वांनाच परिचयाची आहे .

Stressful , धावपळीच्या जीवनशैलीमुळे Oxidative stress शरीरात निर्माण होतात व त्यामुळे ( toxins ) मंद विषाक्तता तयार होते . देशी गायीच्या पंचगव्य , घृत , सेवनाने ही विषाक्तता नष्ट होते .

याशिवाय आहाराचा मुख्य घटक हा धान्य , भाजीपाला , फळे ह्यांची मात्रा हा आहे . तेव्हा हे धान्य नैसर्गिक / कृत्रिम कशा प्रकारचे सेवन करतो यावर व्याधिक्षमत्व अवलबूंन आहे . हे धान्य , भाजी शेतकऱ्यांनी गायीचे शेणखत व देशी गोमूत्राचा वापर करून पिकविला तर त्या धान्यांमध्ये उर्वरा म्हणजे ( नवीन पेशी ) उत्पन्न करण्याची क्षमता निर्माण होते . उत्तम बीजाची निर्मिती होते व पुढील पिढी सशक्त होते . गोमय गोमूत्राचा खत म्हणून वापर केला तर धान्य , भाज्या यामधे toxins नष्ट करण्याची क्षमता विकसित होते .

भारतीय कृषी क्षेत्रात , शेतकरी त्याच्या घरीच शेणाच्या राशीत मागील वर्षी पुरून ठेवलेले बियाणे पुढील वर्षी पेरणीसाठी वापरत असत . शेणाच्या राशीत पुरल्यामुळे शेणामध्ये असणाऱ्या उष्म्याने त्या बीजामध्ये जमिनीतून मिळणारे पोषकत्व धान्यात परिवर्तित करण्याचे सामर्थ्य येते . बीजफलनाचे , पोषणमूल्य चांगले येते . पर्यायाने सजीवांचे पोषण होऊन प्रतिकारशक्ती वाढते . आज याचा विचार IVF , IUI , PCOD अशा विकारांवर Treatment देताना करावा लागतो . असे नैसर्गिक अन्न सेवन केल्यामुळे अन्न पचविण्याची ताकद वाढते , माणसाची प्रतिकारशक्ती वाढते व रोज नियमित षड्रस आहार दूध , तूप सेवन केल्यामुळे दीर्घायुष्य निरोगी लाभते .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच देशी गायीचे दूध , तूप , लोणी यांचा वापर करावा , गोमूत्रावर आधारित शेती , धान्य यांची निर्मिती करावी . ग्रामीण व शहरी भागात दुवा निर्माण करावा . व देशातील सर्वांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करावी . सर्वांनी सुखी असावे . गायींनी सुखी असावे .

अस्तु स्वस्ति गोभ्यः |
वैद्य . अदिती राहुल कुलकर्णी ओंकार क्लिनिक , कल्याण
९८२१६०८३३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..