नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

सुखानंद..

आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. […]

माझं नाटक !

मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं. […]

आहुती

काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी ऐकल्यावर खूप वाईट वाटले….त्यावर सुचलेल्या काही ओळी आहुती! (१४-०८-२०१८) अशीच अगतिक झाले होते, स्वप्न झुल्यावर झुलत होते, मी प्याला त्याच्या प्रेमाचा, अमृत समजुनी पित होते… ओवला मणी त्याचा नावाचा, भाळी कुंकुम टिळक लावले, होम पेटला संसाराचा, आहुती म्हणूनी स्वतःस चढवले… रोज रोजचे तंटे वाजले, अंगी लाल […]

श्रावणी

श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते. […]

अनंत हे अनंतात विलीन झाले

समस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतला वरून गुप्त झाली. […]

गुरु महिमा

आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे. […]

मेघ बरसला

मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. — विवेक पटाईत

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी  हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ‘ म्हणून पाळला जातो. बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही […]

१३ जानेवारी – संगीत शारदा नाटकाचा पहिला प्रयोग

सामाजिक सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मैलाचा दगड बनलेले गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला. हे नाटक रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास घडवला. बालिका-जारठ विवाहांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येला वाचा फुटली. या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या […]

ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर

कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत […]

1 8 9 10 11 12 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..