नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

निरंजन – भाग ५३ – शिकवण

एका गुरुकुलातील हि कथा… जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत. […]

निरंजन – भाग ५२ – सवय

… गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू. […]

आरती वेंकटेशा

माझी स्वरचित वेंकटेशाची आरती आहे. आम्ही फ़क्त याचे करते आहोत. करविता तो श्री वेंकटेशच आहे याची आम्हास नम्र जाणीव आहे. […]

समर्थ “समर्थ “का आहेत?

संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे. […]

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी… […]

भक्तिसंप्रदाय समन्वय !!

वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही. […]

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा… […]

आत्मज्ञान !

इतरेजन जेव्हा योजना आखण्यात आणि स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्यावा. माझ्याभोवती खूप वैभव आहे, माझ्या क्षमता, दृष्टी आणि आकांक्षा यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, मी सतत काहीतरी  ‘करण्यापासून’ आता फक्त ‘असण्यात’ मग्न आहे, अस्तित्वात असलेल्या सगळ्या लहानथोर गोष्टींनी ,बदलत्या संक्रमित निसर्गाने मी चकित होत असतो, असं वाटणं स्वाभाविक असतं. […]

विठू ‘माउली’ च्या अंगणातील दोन अश्वत्थ – दांडेकर आणि देगलूरकर !

विठ्ठलाला आणि “माउलीं “ना अभिप्रेत असलेला वारकरी जीवनप्रवाह साक्षात जगणारे दोन कैवल्यधर्मी म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर आणि वै. धुंडामहाराज देगलूरकर ! त्यांच्या उल्लेखाविना ही “वारी” कायमच अपुरी राहील. दोघेही आयुष्यभर “ज्ञानेश्वरी” जगत राहिले.एक ज्ञानमार्गाचे बोट धरून विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद सिद्ध करीत राहिला तर दुसऱ्याने भक्तिमार्ग चोखाळला. गंतव्य एकच होते आणि अंतिमतः ज्ञानेश्वरीने ते गाठायला मदत केली. […]

1 41 42 43 44 45 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..