अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे. […]
हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. […]
सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. […]
पावसाळा सुरू झाला की निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते. ठिकठिकाणी निसर्ग खुलून जातो, हिरवीगार वनराई फुलू लागते, फुलांच्या गालिच्यांनी धरती परत एकदा आपलं शरीर मुक्तपणाने सजवते पण त्यास माणूस एक संधी म्हणून त्याची ओढ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी करून घेतो आणि पावसाळा मृत्यूचे द्वार उघडायला कारणीभूत ठरतो. […]
पूर्वीच्या काळी रणांगणावर आपले कर्तृत्व दाखवायला अनेक प्रकारची शस्त्रे असायची. तलवार, भाला, धनुष्यबाण इत्यादी पण जसा काळ बदलत गेला तशी शस्त्रे सुद्धा अपग्रेड होत गेली. […]
जेव्हा माया करणारी व्यक्ती जवळ असते तेव्हा कसलीही चिंता वाटत नाही, पण तीच व्यक्ती मायावी विचारांची असेल तर? इथेच समाज बदलत जातोय, इथेच विचारधारा कष्ट कमी आणि लाभ जास्त या विचारांना आपलंसं करतायत आणि म्हणूनच तपस्वी प्रमाणे माया करणारी माय सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघते आपल्या वानप्रस्थाश्रमाकडे. […]