आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे. […]
स्वामी विवेकानंद म्हणत “स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.” स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले. […]
मंत्र म्हणजे तरी काय? तर आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, ‘मंत्र’ म्हणजे मन त्या त्रयीत लय करून जो शब्दोच्चार केला जातो, तोच मंत्र होय. (याचाच अर्थ, मन + त्र म्हणजे तीन ज्ञानेंद्रिये अर्थात नाक, कान आणि डोळे म्हणजेच त्रिकुटी एका ठिकाणी एकाग्र होत असते, तेव्हाच मुखातून जो प्रणव ओम् सहित बाहेर पडतो किंवा ज्याचे उच्चारण केले जाते तोच हा मंत्र होय.) […]
पुण्यात राहात असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या विपश्यना केंद्राची पाटी अनेक वेळा पाहिली होती. पण मनात असूनही कधी चौकशी केली नव्हती. पुढे बघू…आत्ता काय घाई आहे, या नावाखाली मनातली उत्सुकता पूर्णपणे दडून गेली. पण अमेरीकेत सहा महिन्यांसाठी मुलाकडे आल्यावर मात्र असा योग आला की… अमेरिकेत आल्यावर लांबच्या, जवळ्च्या, स्थळांना मुलाच्या-सुनेच्या सवडीप्रमाणे भेटी देत होतो. संपूर्ण हिरवागार परिसर… […]
माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे. […]