नवीन लेखन...

थोडे तुझे – माझे

रोज रोज तेचं तेचं लाडू नकोत गोडाला कधीतरी चवीसाठी ठेचा हवाच ठसक्याला तसेच आहे आयुष्यात लावून घेऊ नये मनाला थोडे तुझे थोडे माझे घेऊन लागू प्रवासाला थोडे दिवस शांत शांत घरात राहिलं अबोला चांगलेच असते वादापेक्षा काहीच आपण न बोला वेळ जातो तसे वाटते उगीच बोललो जीवाला जाऊदेत सोडून देऊ सारे काही वेळेला आपण सारे विसरतोही […]

का कुणास ठाऊक

का कुणास ठाऊक हल्ली काव्य उमलत नाही शब्दांची पखरण पुन्हा अलगद मनात बहरत नाही का कुणास ठाऊक शब्द हृदयात फुलतं नाही हरवल्या वाटेवर जुनी माणसे पुन्हा भेटत नाही का कुणास ठाऊक मनाचे मनाला उमगत नाही निःशब्द शांततेतील भाव एक दुसऱ्यांना कळत नाही का कुणास ठाऊक ओढ तुझी मिटत नाही अनामिक होते चांद रात आठवण तुझी लपत […]

माफी

जिव्हाळा नि आपुलकी जा! तूझ्या वाट्यास नाही तुझ्याबद्दल लिहून मी का संपवू लेखणीची शाई आता पुन्हा मवाळ झालास आलासच ना माझ्या दारी कितीही कारले गुळात भिजले तरीही कडू चव सोडणार नाही इतके घाव वर्मी बसले भळभळती जखम ठायीठायी फुंकर घालण्या उशीर झाला आता तुज कधीच माफी नाही जाऊ द्या, माफी देऊ, सोडून देऊ सारे कमलपत्री म्हणणे […]

कोण तू कोण मी

कोण तू कोण मी ओळख अनोळखी आहे वाट वाकडी समोर अशी भेट का दुरुन अबोल आहे कोण तू कोण मी मनात हुरहूर आहे चांद बिलोरी चांदण्यात ओढ तुझी अंतरात आहे कोण तू कोण मी ऋणानुबंध भेटीत आहे प्राजक्त दवात गंधाळला तुझ्यात बंध गुंफून आहे कोण तू कोण मी कोडे न उलगडणारे आहे नियतीचे फासे उलटे सारे […]

खरी प्रकाशित दिवाळी

अंधार गुडूप झाला तर घाबरे कशाला विजेच्या शलाकेला कशास दिवा उजेडाला कायम असत्य दावणीला बांधे कुकर्म जो गाठीला त्यास असे भीती तमाची दचके अपुल्याचं सावलीला प्रतिबिंब पाहता अपुले जो कचरे स्व नजरेला नतमस्तक होतानाही हुरहूर छळे काळजाला नको नको ते भाव उदास दाटे कातर समयाला चोरी आहे मनाची आणिक भितो तो कुणा चोराला या दिव्यात उजळून […]

स्मृतीलहरींच्या हिंदोळी

स्मृतीलहरींच्या हिंडोळ्यावरी तनमन झुलते , हरिच्या गोकुळी।।धृ।। ब्रह्म ! मुरलीधरी हरि सावळा मधुरम , मंजुळ घुमवी बासुरी प्रसन्न ! गोकुळी राधाच बावरी छुमछुम , छुमछुम छंद गोकुळी।।१।। नादब्रह्म ! चराचरी हरेगोविंद हरे , हरेराम , रामकृष्णगोविंद हरिकृपाच ! तोषवीते आगळी देवकीनंदन यशोदेच्या गोकुळी।।२।। प्राजक्त ! डुले सत्यभामा द्वारी सडा फुलांचा रुक्मिणी अंगणी प्रीतीच निर्मळ , देवत्व […]

जगलो कसा किती?

जगी मी जगलो कसा कळले नाही पण भोगले ते कधी विसरलो नाही आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो तो सहवास लाघवी विसरलोच नाही भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान दोष! कधीही कुणाला दिलाच नाही लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला हताश होऊनी […]

सांत्वनी दुःखहारी

दुःखवेदनाच ! सखी खरी । आठवांतुनी झुळझुळणारी । मुक्त हृदयांतरी बिलगणारी । सत्य ! स्वसांत्वनी दुःखहारी ।।१।। दुःखाचे पावित्र्य ! आगळे । ते कां? सहचजी, उमगते । सुखदु:खाचे दान भाळीचे । भोग भोगणेच ! जन्मांतरी ।।२।। अनाहत लाठी भगवंताची । ऋणानुबंधीच साऱ्या गाठी । तोच जोडितो,तोच तोडितो । जपुया ! सत्कर्माची शिदोरी ।।३।। जन्मा ! येताजाता […]

तुझे शब्द

मुळ हिंदी कविता- कवि – अनूप भार्गव, अमेरिका; अनुवादक- विजय नगरकर […]

जन्म मानवाचा

जीवन, जगण्यासाठी जीव, आतुरलेला आहे जन्म! हा मानवाचा विवेकी जगायचाआहे ऋतूऋतूंचे आविष्कार निसर्गाचे वरदान आहे नाती सारी ऋणानुबंधी भावप्रिती! साक्ष आहे अंतरी लळा जिव्हाळा प्रारब्धाचे वरदान आहे शिरी आभाळ नक्षत्रांचे मनस्वी सुखशांती आहे निर्मोही स्पर्श भावनांचे स्वर्गसुखाची नांदी आहे जगता जगता जगवावे मानवी नितीमुल्य आहे येताजाता रिक्त ओंजळी अंतिम नग्न सत्य आहे सदा भजावे अनामिका तो […]

1 87 88 89 90 91 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..