नवीन लेखन...

कधी भेटशील का रे तू?

कधी भेटशील का रे तू?
येशील तर सोनचाफा घेऊन ये,
मोगरा आणलास तर तो मोहर
आसमंत खुलून जाऊ दे..
कधी भेटशील का रे तू?
आलास तर रातराणी घेऊन ये,
तू गेल्यावर बहर तो रातराणीचा
तुझ्या जाण्याची खूण ओंजळीत अलगद उमलू दे..
कधी भेटशील का रे तू?
तुझ्या मिठीची आस अलवार अशी,
त्या मिठीत मला हलकेच मिटू दे
हलकेच मज तू तेव्हा टिपून घे..
कधी भेटशील का रे तू?
आलास तर केवडा गंधित घेऊन ये,
जातांना मी अलवार लाजेल
ते लाजणे तू तारकांत गुंफून घे..
कधी भेटशील का रे तू?
कितीक गोड आर्जव मी करावी,
आलास तर चाफ्याची फुले तू आणावी
घेता मला मिठीत दरवळ अधिक मोहरावी..
कधी भेटशील का रे तू?
वाट मी अशीच पाहावी,
अलवार चांदण बरसात
त्या चांदण्यात मी गंधाळावी..
कधी भेटशील का रे तू?
मोहात तुझ्या मी अलगद फसली,
बंध गोड मोहक तुझे अबोल जरी
वेल्हाळ मी अशीच एक वेडी बावरी..
कधी भेटशील का रे तू?
माझी आठवण तू अवचित काढावी,
बावरे मोहक क्षण धुंदीत अबोलसे
मोहक मधुर माझ्या शब्दांची तू सय जपावी..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..