नवीन लेखन...

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा । दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी । हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले । बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी ।। […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।। एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।। सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख । दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।। तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा । परि अंर्तमन सांगत […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

लावा ‘कवी’मनाला व्हिसा कुणी !

माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण, कविमन तर त्याहून ‘पक्षीण’, गगनात माराया उंच भरारी, मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी ! “यांना” विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ? आणि झरझर घरट्यात येते कधी ? स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी, तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी ! स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले, म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले ! कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण, […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम यश येई तुला, तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ, आपल्या शक्तीचे झेपेल कां ते, विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी निराश न होई, त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४. डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

स्वप्न

भूतकाळाला विसरून, वर्तमानात सुधारण्याच्या सतत प्रयत्नात असतो डोळस रचत स्वप्नांचे मनोरथ ! डोळसांनी बघितलेली असतात स्वप्न त्यांच्या मनातली त्यांनी पाहिलेली उघडया डोळ्यांनी ! डोळसांनी जीवनात रंगीत, काळं-बेरं, चांगलं-वाईट बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं पण स्वप्नातील वास्तवात नको असतं ! जन्मताच अंध असलेल्यांची ओळखच नसते रंगांशी, आकार, उकारांशी, चांगल्या वाईटाची ! त्यांना कधी स्वप्न पडत असतील का? कसे […]

1 392 393 394 395 396 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..