कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
ध्यानाने काय साधले
ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।। संसारांत रमलो मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार […]
असा मी काय केला गुन्हा?
कुठले नाते? खरे की खोटे? काही कळेनासे वाटे ! बंधने तोडोनी नात्यांची, इज्जत गेली पुर्षार्थाची ! कशी नाही रे शर्म वाटली तुला, आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना? जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर, समजले मला आईच्या नशिबीचे भोग ! विश्वासावे सख्या भावावर, पण त्यानेही केला कळस सर्वांवर ! जन्मल्याच केली असतीस हत्या तर, निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर ! तूटले […]
सदैव नामस्मरण
प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची । खात्री करिता सत्यता पटली याची ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती । […]
नशीब…
तुझी ती भेट अंतरंगात जपली तुझ्या विरहाने आग मनात लागली. तुझे ते रुप चंद्रमा नभात तुझी ती वाणी हसरी प्रभात भेटण्याची वेळ असे तुझ्या मनाची मी सदेेेैव पाहतसे वाट तुझ्या येण्याची वचन तु दिलेस सा ठेवुन प्रेमाची फसवून तु गेलीस लाज ठेव तया वचनाची ना दुसरीचे रुप माझ्या निरमल मनात निघून येशील पुन्हा हेच असावे माझ्या नशीबात…… — […]
जीवन परिघ
एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्या वरती १ वाहण्याची क्रिया चालली युगानुयुगें या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी जगाला […]
रावण वृत्ती
रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति । व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं । कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला । रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला….४ […]
भविष्यातील अमृत !
भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे, मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे ! आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे ! शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील? समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील ! कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील ! अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले, बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले ! ‘अमृत’ प्राशनाने […]
मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]
आधुनिकता
नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
