नवीन लेखन...

नशीब…

तुझी ती भेट अंतरंगात जपली तुझ्या विरहाने आग मनात लागली. तुझे ते रुप चंद्रमा नभात तुझी ती वाणी हसरी प्रभात भेटण्याची वेळ असे तुझ्या मनाची मी सदेेेैव पाहतसे वाट तुझ्या  येण्याची वचन तु दिलेस सा ठेवुन प्रेमाची फसवून तु गेलीस लाज ठेव तया वचनाची ना दुसरीचे रुप माझ्या निरमल मनात निघून येशील पुन्हा हेच असावे माझ्या नशीबात……  — […]

स्वातंत्र्य की परतंत्र

निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे. […]

प्रेम आंधळं असतं, हेच खरं?

वलयांकित स्त्री-पुरुषांचं नीतिबाह्य वर्तन जनतेच्या लघुस्मरणामुळे व त्यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेमुळे समाजाच्या पचनी पडतं. त्यांच्या मुलांच्या जीवनात फारसा अडथळा निर्माण होत नाही. पण सर्वसामान्यांनी त्यांचं अनुकरण केल्यास त्यांना कुजबुज, तुच्छतादर्शक कटाक्ष आणि तिरस्कारयुक्त वागणूक समाजाकडून मिळते. प्रथम-पत्नीचे व मुलांचे तळतळाट सुख लाभू देत नाहीत. आपल्या आवडत्या नायक-नायिकांच्या आयुष्याचा असला आदर्श समोर ठेवला तर आजची तरुण पिढी स्वैरच होईल. […]

आम्ही सार्‍याच गांधारी

किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली

पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा

झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं

नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार

फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
[…]

फसवणुकीचे धंदे

कन्फ्युज्ड माइण्डसेटमध्ये माणसं आपल्याला कोणतं बक्षीस लागलं बुवा, हे बघायला आणि चकटफू डिनर चाखायला सपत्नीक जातातही. आणि तिथेच फसतात. तिथे गेल्यावर तुमच्या बायकोच्या हातात येतो एखादा लेमनसेट. किंमत साधारण शंभर-सव्वाशे रुपये. हॉटेलचा पंचतारांकित भपका, बुफे जेवण याचा नाही म्हटलं तरी काही परिणाम तुमच्यावर होतोच. तुमच्या डोळ्यांमधले चंचल ससे मग एक डुलकी काढतात आणि आसपासची मार्केटिंग करणारी कासवं आपलं डोकं वर काढतात. एखादी तरुणी मधाळ आवाजात एखाद्या प्लॅण्टेशनची, रिसॉर्ट किंवा मोटेलची किंवा टाइम शेअरिंगची योजना तुमच्या गळी उतरवू लागते. तिला तुम्ही पटकन नाहीही म्हणू शकत नाही. किंवा नाही म्हणायला तुम्ही मध्यमवर्गीय सबबीने पटकन सांगता की मी आता चेकबुक आणलेलं नाही. इथेच तुम्ही अडकता. ती लगेच म्हणते ‘हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा. मी माझा एक माणूस तुमच्यासोबत घरी पाठवते. तुम्ही त्याच्यासोबत डाऊनपेमेण्टचा चेक द्या.’ एका लेमनसेट आणि बेचव जेवणाच्या बदल्यात तुम्ही लाख-सव्वालाखाच्या व्यवहारात अडकलेला असता. […]

हम दो – हमारे दो

११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४. […]

एकेरी पालकत्वाचे आव्हान

येणार्‍या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्‍या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का? […]

पुरूषांना नको का माहेर?

असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा. […]

शांततेचा लंबक इकडून तिकड

थोडक्यात- मानवाच्या प्रत्येक जखमेवर, दु:खावर काळच मात करू शकतो. त्यावर तोच उपाय आहे. काळाच्या ओघात हा आघातही दूर होईल. आता मी जे या खेपेला सांगितले, त्याचे तूही रोज मनन करशील. हे दोस्त, उदास… निराश नको होऊस! […]

न्यायदानाची बिकट वाट

जेव्हा लिखित कायदेच अस्तित्वात नव्हते आणि न्यायाची सर्वसाधारण तत्त्वे फत्त* लक्षात घेऊन न्याय करावयाचा होता, तेव्हा एका अर्थाने न्यायाधीशाचे काम सोपे तर दुसऱ्या अर्थाने अवघड होते. सोपे यासाठी की त्याच्या न्यायबुद्धीला भरपूर स्वातंत्र्य होते. संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यावे, पक्षकारांच्या हक्कांचा आजवरच्या परंपराच्या आधारांवर निर्णय करावा, जेथे धर्माचा संबंध असेल तेथे त्या धर्मातील ढोबळ नियमांची माहिती करून […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..