नवीन लेखन...

आत्मा-ईश्वर – आई

आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई | त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१|| आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर | स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२|| सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती | स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३|| चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी | होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती  ।।१।।   अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी  ।।२।।   सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती  ।।३।।   तळमळ आता […]

न्याय देवते

कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी  ।। १ ।।   परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी  ।।२।।   दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी  ।।३।। […]

म्हणूं नका

लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]

सुवर्णमहोत्सव राज्याचा : १ मे, २०१०

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

जखमांचे वृण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती  ।।१।।   विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।   मनाची सबलता हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।   सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   — […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

1 365 366 367 368 369 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..