एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल. […]
रामानुज नावाचे एक थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. त्यांचा मोठा शिष्य समुदाय होता. एक दिवस त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला “मला परमेश्वरप्राप्ती करायची आहे. मला प्रार्थना करायला शिकवा. कुठून सुरुवात करु तुम्हीच सांगा.” […]
एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.” […]
एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव. […]
चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या. […]
‘तू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले… ताे तरूण गेला व तासाभरात मसाला […]
राष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे. […]
सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता. प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका. […]
‘धडधड धडधड कर्र…कच…कच…!’ कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्याचीवाडी….चलो भुर्याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि […]