नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १८ – सावरकर आणि टिळक

लोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच  राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १७ – सावरकर यांचे व्यक्तिमत्व

सावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. लहानपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे शरीर मजबूत होते चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. […]

तुका आकाशा एवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. माधुरी विजय भट  यांनी लिहिलेला हा लेख श्री ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवतधर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची कामगिरी देहूच्या तुकोबारायांनी पार पाडली. जगामध्ये पूर्वीपासून तसेच आजही भारतीय अध्यात्मविद्या हीच अग्रणी राहून मार्गदर्शन करीत आहे. भारतीय संतांनी विशेषतः महाराष्ट्रातील पाचही संप्रदायातील संतांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला. […]

अर्धशतकी त्रिवेणी – तो, मी, पडदा !

” गहरी चाल ” अशा आकर्षक नावाच्या चित्रपटाने फसवणूक झालेला मी रिकाम्या हातांनी बाहेर पडल्यामुळे चिडलो होतो पण भुसावळच्या वसंत टॉकीज मध्ये “जंजीर” पाहताना दचकून ताठ बसलो – ” ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं ! ” पडद्यावर प्राणही तितकाच दचकला असावा. आणि आज तो /जया सोडले तर त्या अंगारांचे साक्षीदार (प्राण, इफ्तेकार, ओम प्रकाश, अजीत, प्रकाश मेहरा) निघून गेले आहेत. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १६ – सावरकर व समर्थांची साम्यस्थळे

रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही  खरा देव कोणता याची ओळख पटली. […]

भावानुबंधाची पुनर्भेट

कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते. […]

निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा

महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत. […]

बालगंधर्व रंगमंदिराची रंजक गोष्ट

बालगंधर्व रंग मंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्याअगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: रंगमंदिराची वीस लाख खर्च करून रंग मंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे. […]

राजकीय पक्षांचे जाहिरनामे

सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १५ – सावरकरांचे द्रष्टेपण

ज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे  समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते. […]

1 112 113 114 115 116 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..