नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १६ – सावरकर व समर्थांची साम्यस्थळे

रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही  खरा देव कोणता याची ओळख पटली. समर्थांना विश्वव्यापाक रामाचे रूप समजले. सावरकरांना मूर्तिपूजा गौण व मातृभूमीची सेवा महत्वाची ही समजले. दोघेही प्रयत्नवादी होते. समर्थ म्हणत “जितुके काही आपणास ठावे l तितुके हळूहळू शिकवावे l शहाणे करून सोडावे बहुत जन l हेच सूत्र सावरकरांनी अंदमानात अवलंबिले  बनद्यांना लिहा वाचायला शिकवले. राजबंदीना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र याचा अभ्यास करायला प्रोत्साहन दिले.

दोघेही एकांतप्रिय होते.एखादे कार्य करत असत तेव्हा सामर्था सभोवती शिष्य असत, पण ते संपल्यावर ते एकांतात जात “एकांती चाळणा करावी l धारणा उदंड धरावी l नाना विचारणा करावी l अरिमित्रांची l सावरकर सुद्धा कार्यकर्त्यांचा गराडा संपल्यावर एकांतात चिंतानासाठी जात. अखंड सावधानता ही सुद्धा दोघांची विशेषता होती. समर्थ सांगत “ प्रसंग हा तूफान रे l नकोचि वेवधान रे l डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी काश्मिरात जाऊन सत्याग्रह करणार ही कळल्यावर एका विश्वासू माणसाच्या हाती सावधानतेचा इशारा देणारे पत्र एका कार्यकर्त्यासोबत  पाठवले टपालाने नाही. समर्थ कुबडीत शस्त्र बाळगत तर सावरकर खिशात लहान खंजीर बाळगत. आपल्या  १८५७ वरील पुस्तकावर इंग्रज बंदी घालणार ही सावरकरांना ठाऊक होते म्हणून त्यांनी ते पुस्तक हॉलंड मध्ये छापले व गुप्तपणे सगळीकडे पाठवले.

— रवींद्र वाळिंबे 

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई ).

 

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..