नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १३ – सावरकरांची भाषाशुद्धी

सावरकर भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा आग्रह होता, आपली मातृभाषा समृद्ध असायला हवी त्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव कशासाठी हवा? त्यांचे म्हणणे होते की problem न म्हणता समस्या म्हणा.

एकदा महामहोपाध्याय पोतदार सावरकरांना रत्नागिरीत भेटायला  गेले. ते म्हणाले “ तात्याराव आम्ही जे परकीय शब्द आत्मसात केले आहेत व पचवून टाकले आहेत,ती  आमची विजयचिन्हे आहेत” सावरकर म्हणाले “तुम्ही चुकताय ,ती  आमची विजयचिन्हे नव्हेत तर भाषेच्या अंगावरील व्रण आहेत”. आपल्या भाषेत परकीय शब्द घुसतात कसे याचा सावरकरांनी बारकाईने अभ्यास केला. मराठी भाषेत परकीय शब्द ओळखता यावेत म्हणून सावरकरांनी “मराठी भाषेचे शुद्धीकरण “ हे पुस्तक लिहिले. हायस्कूल होते त्याचे प्रशाला झाले. अत्रे प्रिन्सिपल होते त्याचे “आचार्य” हे नामकरण सावरकरांनी केले. २० जून १९३७ ला सावरकरनी  कोल्हापूर येथील “हंस पिक्चर्स” ला भेट दिली तेथे त्यांना सर्व पाट्या इंग्रजीत लिहिलेल्या दिसल्या. त्यांनी पेंढारकरांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले .

सावरकरांनी इतर भाषेतील शब्दाना प्रती मराठी शब्द सुचवले आणि आश्चर्य म्हणजे आज ते मराठीत इतके रुळले आहेत की  सावरकरांनी ही प्रतीशब्द दिले आहेत,  यांची साधी कल्पनाही आपल्याला नसते. त्यातील काही मराठी प्रती शब्द,(कंसातील शब्द परकीय भाषेतील),दिनांक,( तारीख ),क्रमांक ( नंबर) इतिवृत्त ( अहवाल) नगरपालिका( म्युनसिपालटी) महापालिका (कोरपोरेशन) महापौर ( मेयर ) पर्यवेक्षक ( सुपरवायझर)विश्वस्त ( ट्रस्टी) शिरगणती ( खानेसुमारी) नभोवाणी ( रेडियो) दूरदर्शन ( टेलिव्हिजन). याचा अर्थ परकीय भाषा शिकूच नयेत असे सावरकरांचे म्हणणे नव्हते. आपल्या प्रगतीसाठी परकीय भाषा शिकाव्या,पण मातृभाषेला विसरता नये असे सावरकर म्हणत.

— रवींद्र वाळिंबे.

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)

 

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..