नवीन लेखन...

मी एक भाग्यवान

आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते . […]

कापसापासून सुतापर्यंत

अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. […]

संस्कारांच्या भिंती

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही. […]

विधायकतेच्या वाटेवर

एकुणच भारतात मुद्रणाची कला सार्वजनिक होत गेली आणि त्या सोबत प्रसार माध्यमांचा ‘प्रसार’ होण्यास सुरवात झाली. पहिली १५० वर्षे प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके असंच स्वरूप होतं. १९८० नंतर आपल्याकडे दूरदर्शनचे जाळे पसरू लागले. २० व्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी खासगी दूरदर्शन वाहिन्यांची सुरुवात झाली. २१ व्या शतकात पहिल्या दशकानंतर सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) सुरू झाली. […]

भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच. […]

विवाह संस्था

उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते. […]

लोककलेतून स्वदेशी वारे

लोककला आणि स्वदेशी या दोन संज्ञांचा विचार करत असताना एक लक्षात येते की, या दोन संज्ञा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. परस्पर निर्मिती, योग यातून दिसून येतो. ‘स्थानीयता’ या दोन्ही संज्ञाचा मूलाधार आहे. […]

व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला माज-हिंदुपंच

मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे नाव आहे हिंदूपंच. त्याचा पहिला अंक २१ मार्च१८७२ रोजी प्रसिद्ध झाला. ठाणे शहरातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न तब्बल १४ वर्षांपूर्वी झाला. त्याला निश्चितपणे ऐतिहासिक महत्त्व आहे. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे मालक चालक संपादक होते. पुढे त्यांची जबाबदारी कृष्णाजी काशिनाथ ऊर्फ तात्या फडके यांच्यावर आल्यावर त्यांनी त्या पत्राचा प्रभाव चांगलाच वाढवला. […]

देशी हुन्नर आणि स्वदेशीपणा

स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं. […]

उपनयन विधी

नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई […]

1 39 40 41 42 43 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..