नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

रेडिओचे जादुई दिवस

आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं. […]

मुंबई ते दिब्रुगड (आसाम): प्रवास राजधानी एक्सप्रेसचा

भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक […]

भारतमातेच्या वीरांगना – 4 : अरुणा आसफ अली

१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला. […]

फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)

मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव ‘फ्रंटियर मेल’ असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला ‘सुवर्णमंदिर एक्सप्रेस’ असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते. ब्रिटिश […]

भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]

संगीतभूषण पं. राम मराठे

रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे. […]

रेल्वेची शान दुरान्तो एक्सप्रेस’

रेल्वेनं गेल्या २० वर्षांत अनेक नवीन प्रवासी गाड्या सुरू केल्या. त्यांपैकी गेल्या ४ वर्षांत प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या गाड्या म्हणजे ‘दुरान्तो एक्सप्रेस’. ‘दुरान्तो’ हा बंगाली शब्द असून, त्याचा अर्थ दूर पल्ल्याची शेवटच्या स्थानकापर्यंत सतत धावणारी गाडी. या गाड्यांची सुरुवात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना झाली होती. त्यामुळे पहिली दुरान्तो मुंबई-कलकत्ता सुरू झाली व हळूहळू भारतभरात अनेक मार्गांवर दुरान्तो […]

‘शून्य’ तापमानाकडे

शून्याखालील २७३.१५ अंश सेल्सियचं तापमान म्हणजे भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पदार्थाचं तापमान जसंजसं या विशिष्ट तापमानाच्या जवळ जातं, तसे त्या पदार्थाच्या गुणधर्मांत आश्चर्यकारक बदल होत जातात. निरपेक्ष शून्य तापमानाच्या जवळ त्या पदार्थाचं एका नव्या स्थितीत रूपांतर होतं. या स्थितीत, त्या पदार्थातले सर्व रेणू एकत्रित होऊन, त्या सर्वांचा एक मोठा रेणू झाल्यासारखा भासतो. पदार्थाची ही स्थिती अत्यंत विस्मयकारक आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 2 : राणी वेलु नाचियार

इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. […]

सत्य ठरलेलं स्वप्न -कोकण रेल्वे – भाग दोन

रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची ‘रो रो वाहतूक सर्व्हिस’ हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात […]

1 59 60 61 62 63 222
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..