नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे? उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ!

केरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलत नाही. प्रादेशिक अस्मिता लोप पावल्यामुळे महाराष्ट्राची धर्मशाळा झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत आणि पुणे नाशिक, नागपूर सारख्या शहरात दैन्यावस्था आलेली आहे. […]

धोकादायक देशांतील भारतीयांची सुरक्षा : काही उपाययोजना

अमेरिकेप्रमाणे आपण भारतातून परदेशात जाणार्‍या पर्यटकांनाही अशा धोकादायक देशांविषयी, तेथील परिस्थितीविषयी माहिती देणे, इशारा देणे गरजेचे आहे. अशांत देशांतील भारतीयांची सुरक्षा,धोकादायक परिस्थितीमध्ये बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन प्लॅन आणी भारताची ‘होस्टेज रेस्क्यु पॉलिसी लवकरात लवकर तयार करुन त्याची वेळोवेळी रिहर्सल करणे व जरुरी पडल्यास त्यावर अंमल बजावणी करणे जरुरी आहे. […]

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही. […]

सरकारी कर्मचार्‍यांना सैन्यात ५ वर्ष काम अनिवार्य करण्याची शिफारस

डिफेन्स पार्लमेंटरी समितीने सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांच्या नोकरीच्या पहिले पाच वर्षे ही सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल. […]

श्री. (ना)राज ठाकरे आणि पाडव्याचं भाषण

परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे. […]

स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही. […]

आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

आज जरी आपल्याला यातील बऱ्याच शस्त्रक्रिया अगदी सोप्या ‘रुटीन’ वाटत असल्या तरी शंभर काय अगदी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच निराळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही सगळ्यात वरची पायरी होती पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेच प्रयत्न झाले. खरेतर १८९६ मध्येच पहिली हृदय-शस्त्रक्रिया करण्यात आली. […]

घाबरलेले पुतळे..

नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही. […]

ब्लादिमीर लेनिन आणि नाशिक ते मंत्रालय !

आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. […]

हृदयरोगाचा अर्वाचीन इतिहास

आधुनिक इतिहासात हृदय-विकार किंवा खरेतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी सम्बन्धित आजार यावर प्रथम लक्ष वेधण्याचे निवेदनाचे श्रेय विल्यम हेबरडीन यांना जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे विकार डोके वर काढतात असे दिसून येते. वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरण यामुळे आहाराच्या पद्धतीत बदल झाले, अंगमेहनतीची कामे बाजूस जाऊन बैठ्या जीवनशैलीचा शिरकाव झाला. त्यामुळे हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले […]

1 211 212 213 214 215 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..