नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

मालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज

भारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही. […]

हृदयविकाराची प्राचीन कहाणी

ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे. […]

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक ही पाण्याच्या बुडबुड्यासारखी आहे. हा बुडबुडा कधीही फूटू शकतो. त्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक एका फटक्यात शून्य होऊ शकते. अर्थात, या इशार्‍यानंतरही या आभासी चलनाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. याचे कारण अवैध किंवा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसाठी तसेच आभासी चलन गोळा करून काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हे एक सुरक्षित माध्यम ठरते आहे. […]

बांगलादेशी घुसखोरी आणि जनरल बिपीन रावत

आसाममध्ये बांगलादेशी लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३०.९०% होती. पण एका दशकानंतर तिचा वाटा ३४.२०% झाला.पश्चिम बंगाल, बांगलादेशी लोकसंख्येचा वाटा २००१ मधील एकूण लोकसंख्येच्या २५.२०% वरून, २०११ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २७.००% वर पोहोचला आहे. […]

आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे

महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे. […]

छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन देशासमोरची आव्हाने कमी करा

देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे. […]

मृत्यु आणि स्वा. सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता. […]

हृदय – प्रत्यारोपणाची पन्नास वर्षे

आज आपण हार्ट- ट्रान्स्प्लांट (हृदय-प्रत्यारोपण) बद्दल बोलतो. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर एका जिवंत माणसाच्या शरीरातील निकामी हृदय काढून त्याजागी दुसरे सुस्थितीतील हृदय बसविणे व ते चालते करणे ही प्रक्रिया म्हणजे हृदय-प्रत्यारोपण!३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात, ग्रुटे शुर रुग्णालयात, डॉ ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली त्या घटनेला गेल्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. […]

बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज

ईशान्य भारतातील लहान राज्यात बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुका त्रिपुरात 18 फेब्रुवारीला, मेघालय व नागालँड या दोन राज्यांत 27 फेब्रुवारीला होतिल. मात्र याला मिडीयात,कुठल्या वाहिन्यांमध्ये खास स्थान मिळाले नाही. या तिन्ही विधानसभांच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी 60 इतकी आहे. ईशान्येकडच्या राज्यांची एकूण सदस्य संख्या बंगालपेक्षाही […]

संरक्षण अर्थसंकल्प २०१८ : गरज मोठी, तरतूद छोटी!

या वर्षीचे संरक्षण बजेट हे ७.८१ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजे मागच्या वर्षी असलेले २९५५११ कोटींहून २७४११४ कोटी एवढे वाढलेले आहे. मात्र हे अतिशय कमी आहे. यामुळे आधुनिकीकरणाला चालना मिळेल ही आशा रसातळाला मिळालेली आहे. १९६२ पासून आपण जर संरक्षण बजेटचा अभ्यास केला तर ही वाढ सर्वांत कमी वाढ आहे. […]

1 212 213 214 215 216 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..