नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

पाकिस्तानी सैन्यात पडलेली फूट : दहशतवाद कमी करण्यास भारतास संधी

लष्कर म्हणेल तो पंतप्रधान होतो, अशी स्थिती असताना, सध्या तिथे लष्करप्रमुखाचे पद वादाच्या भोवर्यात सापडणे, ही अभूतपूर्व घटना आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा २९ नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. त्यांना इम्रान खान सरकारने १९ ऑगस्ट रोजी एकदम तीन वर्षांची मुदतवाढ देऊन टाकली. […]

व्यवस्थांना अंतर्मुख करणारा (अ)’न्याय”?

बलात्कार आणि खुनासारखं नृशंस अमानवी कृत्य करणाऱया बेदरकार गुन्हेगारांना असाच धडा शिकवला जावा, कोर्ट कचेरयांच्या भानगडीत वेळ न दवडता आशा प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा दिली जावी, ह्या जनभावना देशाच्या विविध स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ह्या घटनेला अयोग्य मानणाराही एक वर्ग आहे. कायद्याच्या राज्यात पोलिसांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणे हे या वर्गाला रुचलेले नाही. अर्थात, पोलिसांच्या समर्थनातील आवाजाच्या समोर आज त्यांचा आवाज काहीसा क्षीण आहे. […]

‘ई-नाम’ प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का?

शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]

भय इथले संपत नाही !

सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ‘अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच ‘माणूसपण’ ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. […]

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ‘या देशातील अल्पसंख्यकांना जाण्यासाठी भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही म्हणुन हे जरुरी होते. […]

कॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]

कार्तेगेना

पहाटे पहाटे जहाज जेट्टी वर बांधत असताना इंजिनच्या मुव्हमेंट जाणवल्या होत्या. जहाज पुढे मागे करताना इंजिन चालू बंद होण्याचा आवाज आणि व्हायब्रेशन मुळे कितीही झोपेत असलो तरी जाग आल्याशिवाय राहात नाही . तसही रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी साडे पाच वाजता जाग आली होती. […]

अडव्हान्स, रिटार्ड

ज्या दिवशी क्लॉक अडव्हान्स होते त्या दिवशी सर्व इंजिनियर आणि इंजिन क्रृ ला एक तास लवकर सुट्टी मिळते कारण जहाज नेहमी खोल समुद्रात असते पण डेक ऑफिसर चार चार तासाची वॉच ड्युटी करत असल्याने त्यांना वीस वीस मिनिटे वॉच वर लवकर यावे लागते. जेव्हा क्लॉक रिटार्ड म्हणजे एक तास मागे केले जाते त्या दिवशी रात्री घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातात. रात्री बारा वाजता काटे फिरवून अकरा वाजेवले जातात. असे बोलतात […]

कनाक्काले

जहाज ट्युनिशिया देशातील ला बिझर्ते आणि ला गुलेट या दोन पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करून काळया समुद्राकडे निघाले होते. ला गुलेट आणि ला बिझर्ते या पोर्ट प्रमाणेच ट्युनिशिया या देशाचे नाव सुद्धा त्या देशात जाईपर्यंत कधी ऐकले नव्हते. तस पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश बऱ्यापैकी मोठा आहे पण ज्याप्रमाणे गरीब, निरुपद्रवी आणि शांत लोकांबद्दल जसं […]

‘एनआरसी’ ची अवघड वाट !

देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…! […]

1 158 159 160 161 162 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..